अरिजीत सिंह हा आजच्या काळातील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक असला, तरी त्याचे वैयक्तिक आयुष्य संघर्षांनी भरलेले आहे. आपल्या सुरेल आवाजामागे दडलेली वेदना अनेकदा त्याच्या गाण्यांतून जाणवते. अरिजीतच्या प्रेमकहाणीत दुःख, तुटलेली नाती आणि शेवटी मिळालेला खरा आधार असा संपूर्ण प्रवास आहे.
अरिजीत सिंहने (Arijit Singh)2005 साली फेम गुरुकुल या रियालिटी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. याच काळात त्याला पहिलं प्रेम मिळालं. शोदरम्यान त्याची ओळख रूपरेखा बॅनर्जीशी झाली आणि पुढे दोघांनी लग्न केलं. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या अवघ्या एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. या फसवणुकीमुळे आणि तुटलेल्या नात्यामुळे अरिजीत पूर्णपणे कोलमडला होता.
या कठीण काळाचा अरिजीतच्या मनावर खोल परिणाम झाला. असे म्हटले जाते की याच वेदनेमुळे त्याच्या आवाजात अधिक भावनिक खोली आली. त्यानंतर गायक हीच त्याची ओळख बनली आणि त्याने स्वतःला पूर्णपणे संगीताला अर्पण केलं.
काही काळानंतर अरिजीतच्या आयुष्यात त्याची बालपणीची मैत्रीण कोयल रॉय पुन्हा आली. कोयल आधीच घटस्फोटित होती आणि तिला एक मुलगी होती. अरिजीतने तिच्यासोबतच्या नात्याला नव्या सुरुवातीसारखं स्वीकारलं. कोयलने अरिजीतच्या आयुष्यात स्थैर्य आणि भावनिक आधार दिला.
अरिजीतचं सुपरहिट गाणं ‘तुम ही हो’ हे कोयलसाठीच गायलं गेलं, असं मानलं जातं. हे गाणं त्यांच्या प्रेमाचं प्रतीक ठरलं. 20 जानेवारी 2014 रोजी पश्चिम बंगालमधील एका मंदिरात दोघांनी अत्यंत साधेपणाने लग्न केलं.
आज अरिजीत सिंह आणि कोयल रॉय तीन मुलांसह आनंदी संसार जगत आहेत. अपार यश मिळाल्यानंतरही अरिजीत आजही साधेपणा, शांत स्वभाव आणि जमिनीशी जोडलेली व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. पहिल्या प्रेमातील वेदनेनंतर मिळालेल्या खऱ्या साथीनं त्याचं आयुष्य आणि नशीब पूर्णपणे बदलून टाकलं.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मुंबईच्या गजबजाटापासून दूर अरिजीत सिंहचे रेस्टॉरंट; फक्त 40 रुपयांत मिळते भरपेट जेवण










