Monday, August 11, 2025
Home बॉलीवूड पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीमुळे तापली कंगना रणौत; म्हणाली, ‘हा लोकशाहीवर हल्ला आहे…’

पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीमुळे तापली कंगना रणौत; म्हणाली, ‘हा लोकशाहीवर हल्ला आहे…’

कंगना रणौतने (Kangana Ranaut) अनेक प्रसंगी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आपले मत निर्भीडपणे व्यक्त केले आहे. आता अभिनेत्रीने पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. पंजाबमधील या घटनेमुळे कंगना रणौत चांगलीच संतप्त झाली असून, तिने याला लोकशाहीवरचा हल्ला असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही, तर पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया वाढत आहेत, त्या थांबल्या नाहीत तर त्याची किंमत देशाला चुकवावी लागेल, असेही कंगना रणौत म्हणते.

बुधवारी (५ जानेवारी) पंजाबला गेलेल्या पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला काही आंदोलकांनी अडवले, त्यामुळे त्यांना परतावे लागले. ही घटना सुरक्षेतील मोठी त्रुटी दर्शवते, जी आता देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. त्याचबरोबर अभिनेत्री कंगना रणौतनेही या संपूर्ण घटनेला अत्यंत लाजिरवाणे म्हटले आहे. (kangana ranaut reaction pm narendra modi security breach incident)

गुरुवारी (६ जानेवारी) कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, “पंजाबमध्ये जे घडले ते अतिशय लाजिरवाणे आहे. माननीय पंतप्रधान हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेते, प्रतिनिधी आणि १.४ अब्ज लोकांचा आवाज आहेत. त्यांच्यावरील हल्ला हा प्रत्येक भारतीयावरील हल्ला आहे. हा आपल्या लोकशाहीवरचा सुद्धा हल्ला आहे. पंजाब हे दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत चालले आहे, ते आता थांबवले नाही, तर देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल.”

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

काय आहे प्रकरण
बुधवारी (६ जानेवारी) पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले होते. तेथून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते. खराब हवामानामुळे पीएम मोदींनी २० मिनिटे वाट पाहिली आणि हवामान स्वच्छ नसतानाही त्यांनी रस्त्याने स्मारकाकडे जाण्याचा निर्णय घेतला.

माध्यमातील वृत्तानुसार, पंजाब पोलिसांच्या डीजीपीने सुरक्षा सुविधांची पुष्टी केल्यानंतर, पीएम मोदी रस्त्याने स्मारकाकडे गेले, परंतु स्मारकापर्यंत पोहोचण्यापूर्वी सुमारे ३० किमी आधी पीएम मोदींच्या ताफ्याला आंदोलकांनी रोखले. १५ ते २० मिनिटे पीएम मोदी प्लायओव्हरवर अडकले आणि रस्ता मोकळा न झाल्याने ते त्याच मार्गाने परत भटिंडा विमानतळावर गेले.

हेही वाचा :

हे देखील वाचा