प्रत्येक कलाकाराच्या नशिबात एक अशी कलाकृती येते जी त्यांना आयुष्यभराची ओळख आणि आठवण देऊन जाते. त्यामुळे अशी कलाकृती कलाकारांच्या करियरसाठी आणि त्यांच्या आठवणींसाठी खूपच खास असते. आज मराठी मालिकाविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि टीआरपीमध्ये वर असणारी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते?’. या मालिकेने नुसते चॅनेल नाही तर अनेक कलाकारांना एक नवीन ओळख एक नवीन आशा दिली. लोकप्रियतेचा इतिहास रचणाऱ्या या मालिकेने नुकतेच तीन वर्ष पूर्ण केले. एक साधी गृहिणी असणाऱ्या स्त्रीवर आधारित असणारी ही मालिका अनेक ट्विस्ट आणि टर्न्स घेत पुढे जात आहे. तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मालिकेच्या सेटवर छोटेखानी सेलिब्रशन झाले. मालिकेतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त होत मालिकेबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांगितले. अशातच मालिकेमध्ये ‘अनिरुद्ध’ ही भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या प्रवासाला तीन वर्ष पूर्ण झाली. तीन वर्ष ज्या सैनिकांबरोबर लोकांचे मन जिंकण्याची लढाई लढलो. त्यातल्या काही सैनिकांबरोबर तीन वर्षाचा आढावा घेण्यासाठी अमोध पोंक्षे आणि Qench चे अवधूत यांनी एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. तीन वर्ष मागे वळून भक्तांना सगळ्यांनाच भरभरून बोलायचं होतं.
आमचे निर्माते राजनशाही दिग्दर्शक रवी करमरकर, लेखिका नमिता वर्तक, संवाद मुग्धा गोडबोले रानडे माझे सर्व सहकलाकार सगळ्यांसाठीच हा प्रवास फार अविस्मरणीय असाच होता. प्रत्येक जण एकेक पुस्तक लिहेल इतके अनुभव प्रत्येकाच्याच गाठीशी आहेत. आमच्या दिग्दर्शकाने पहिल्या दिवशी त्यांना असलेली भीती बोलून दाखवली. नमिताने तिच्यावर निर्माते राजन साई यांचा असलेला विश्वास बोलून दाखवला. कलाकाराने त्यांचे त्यांचे अनुभव बोलून दाखवले.
प्रत्येकाकडे खूप काही साठवून ठेवलेलं आहे, असं मला जाणवलं. एक गोष्ट सगळ्यांच्या मनात सारखी होती ती म्हणजे या तीन वर्षात आम्हाला एक छानसं कुटुंब मिळालं. प्रत्येकामध्ये असंख्य रुसवे फुगवे आनंदाचे क्षण चिडचिडचे रागाचे क्षण हवे हवे असे वाटणारे नको नकोसे झालेले क्षण. या सगळ्या अनुभवातून सगळेच जण गेले आहेत. सगळ्यांनाच सगळ्यांबद्दल सगळंच माहीत झालेलं आहे. एकमेकांचे गुण-दुर्गुण पाहिलेले आहेत. प्रत्येकाने एकमेकांची चेष्टा मस्करी करून झालेली आहे. आता तीन वर्षानंतर अशी परिस्थिती आहे…“तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना”.
‘आई कुठे काय करते’ हा हिमालय चढण्याचा प्रवास हा एकमेकांच्या आधाराने एकमेकांच्या साथीने, एकमेकांचा हात धरूनच पार करता येईल याची सगळ्यांनाच जाणीव आहे. या साखळीतला एक जरी निखळला तर पत्त्याच्या डोंगरासारखे सगळेच खाली येऊ आणि त्याचं आमच्यापैकी कोणालाही ओझं वाटत नाही. कारण प्रेक्षकांचे इतकं भरभरून प्रेम जे मिळत आहे. तीच आम्हा सर्वांची प्रेरणा आणि ऊर्जा आहे.” या पोस्टसोबतच मिलिंद गवळी यांनी मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
या मालिकेने सुरु झाल्यानंतर काही काळातच जी काही लोकप्रियता मिळवली ती पाहून दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी या मालिकेला हिंदीमध्ये देखील ‘अनुपमा’ या नावाने सुरु केले. हिंदीमध्ये सुद्धा ही मालिका तुफान यशस्वी ठरली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हॉट! मालदीवच्या समुद्रावर फुलल तुलसी कुमारचं सौंदर्य
‘तुम्ही भारताला….’, आरआरआर चित्रपटाच्या गोल्डन यशावर नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा