Thursday, March 13, 2025
Home मराठी आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी यांनी चक्क नेटकऱ्यांसोबत साधला ‘शब्दांविना संवाद’

आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी यांनी चक्क नेटकऱ्यांसोबत साधला ‘शब्दांविना संवाद’

कलाकार आणि सोशल मीडिया यांचे नाते खूपच वेगळे आहे. सोशल मीडिया आपल्या आयुष्यात आल्यापासून प्रत्येकालाच त्यांचे मतं, भावना व्यक्त करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे व्यक्त होताना दिसतात. वेगवेगळ्या विषयांवर कलाकार आणि त्यांची मते या निमित्ताने लोकांना देखील समजतात. सध्याच्या मराठी मालिका विश्वातील आघाडीची मालिका असणाऱ्या ‘आई कुठे काय करते?’ मधील सर्वच कलाकार लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. याच मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी देखील सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय आहेत. ते नेहमीच त्यांच्या भावना आणि विचार सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी ‘भाषा’ या विषयावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. मराठी भाषा अशुद्ध, शुद्ध, चांगली, वाईट यावर त्यांनी त्यांचे मतं व्यक्त केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “शब्दविना संवाद”!!!

“माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळं शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. मुळात जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतोय. अमेरिकी भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की यांच्या शब्दांत सांगायचं तर भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं, असा नसतो, तर संवाद साधणं असतो’,” असं परखड मत दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांनी सोमवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल २०२३’च्या समारोपामध्ये व्यक्त केलं.
वर्षांवर्ष मला असं वाटत होतं की
मराठी जी माझी मातृभाषा आहे , ती फक्त काहींनाच स्पष्ट, शुद्ध बोलता येते, काहींना ती येतच नाही आणि ते अडाणी आहेत, अशुद्ध बोलतात, गावंढळ बोलतात, त्यातला एक मी पण आहे असं मला वाटत होतं, ज्याला मराठी भाषा नीट बोलता येत नाही, मी अशुद्ध बोलतो.
पण नागराज मंजुळे यांनी खरच या वर पुन्हा एकदा मला ह्या गोष्टीवर विचार करायला लावला आहे.
माझी एक कोपरगाव ची मोठी मामी, अशुद्ध मराठी बोलायची किंवा गावंढळ मराठी बोलायची किंवा गावाकडची मराठी बोलायची असं म्हणूया.
पण पण तिचे शब्द इतके प्रेमळ, मधुर ,मन शांत करणारे असायचे,
कानांना गोड वाटणारे असायचे, आणि या उलट,
मधल्या काळामध्ये , अतिशय मराठीवर प्रभुत्व असणारी एक व्यक्ती, (त्यांचं नाव ? आता ते कशाला मारायला!!!! ….,सांगतोय मी?)
मराठीचा प्रत्येक शब्द कसा उच्चारावा याचं ज्ञान असणारी व्यक्ती, पण त्या व्यक्तीने तोंडातून शब्द काढला रे काढला ले काढला की,माझ्या कानांत कर्कश्य आवाज यायचा , पूर्वी नाही का सॉफ्ट ड्रिंक च्या बाटलीच पत्र्याचं बुच, लहान मुलं फरशीवर घासायचे , आणि एक आवाज यायचा,कानाला त्रास देणारा, तसंच काहीसा, कर्कश्य.
त्यामुळे चांगलं काय, वाईट काय,शुद्ध काय, अशुद्ध काय
काहीच कळत नव्हता,
नागराज मंजुळे च्या बोलण्याने खरंच वेगळा विचार करायला लावला.
मला कधी कधी कोणतीही भाषा नकोच असं सुद्धा वाटतं,
कुत्र्या मांजरांबरोबर ज्या वेळेला मी असतो,
त्यावेळेला ते खूप काही काही बोलत असतात माझ्याशी, मला कळत असतं तर बोलणं, त्यांना काय हवं नको ते मला कळतं किंवा मला का होऊ नको ते त्यांना पण कळतं, असं मला वाटतं.
मग ही कोणती भाषा आहे ?, वेगळीच भाषा आहे का? जी कुठल्याही शाळेत शिकवली जात नाही किंवा भाषाच नाही?
पण किती छान असतो हा अनुभव.
जाऊ द्या, मला वेगळ्या वेगळ्या मानवी भाषांचा, अभ्यास करावाच लागणार आहे ,
पशुपक्षी कुत्रे मांजरे यांच्या भाषेत तर काही मला तुमच्याशी संवाद साधता येणार नाही,
आणि अनिरुद्ध तर काय , कर्कश्य बोलल्याशिवाय राहणार नाही.”

या पोस्टसोबत मिलिंद गवळी यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मिलिंद प्राणी, पक्ष्यांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टला ‘शब्दांविना संवाद’ असे शीर्षक दिले असून, त्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाद कार पण…! शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई
अथिया शेट्टीचा नमस्कार करताना दिसला अहान शेट्टी, फोटो पोस्ट करत म्हणाला…

हे देखील वाचा