चित्रपटसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासोबत काम केलेले ज्येेष्ठ अभिनेते सतीश कौल यांचे निधन झाले आहे. शनिवारी (१० एप्रिल) सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ते ७२ वर्षांचे होते. ते मागील काही काळापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागणही झाली होती. सतीश यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेकजण त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
सतीश कौल यांनी बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत ‘इंद्रदेव’ ही भूमिका साकारली होती. ते मागील काही काळापासून आर्थिक समस्येने त्रस्त होते. त्यांच्याकडे औषधे आणि आवश्यक वस्तू घेण्याइतपतही रुपये नव्हते. त्यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
Sad to know about the demise of well known actor of Hindi & Punjabi films Satish Kaul in #Ludhiyana due to #COVID19 .
He was unwell since a long time .
Heartfelt condolences to his family & near ones .ॐ शान्ति ! pic.twitter.com/vnyP7X8Iyl
— Ashoke Pandit (@ashokepandit) April 10, 2021
मागील काही दिवसांपूर्वी असे वृत्त होते की, सतीश कौल यांची तब्येत खूपच बिघडली आहे. तरीही त्यानंतर असे वृत्त होते की, ते वृद्धाश्रमामध्ये आहेत. यानंतर स्वत: सतीश कौल यांनी सांगितले होते की, ते लुधियाना मधील एका भाड्याच्या घरात राहतात. ते सन २०११ साली मुंबईवरून पंजाबला गेले होते. तरीही पंजाबमध्ये त्यांचे काम अयशस्वी ठरले. सन २०१५ मध्ये त्यांना मोठी दुखापत झाल्याने, ते जवळपास २.५ वर्षे रुग्णालयात होते.
सतीश कौल यांनी पंजाबी आणि हिंदी असे मिळून जवळपास ३०० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. परंतु शेवटी परिस्थिती अशी बदलली की, त्यांच्याकडे घरातील रेशन घेण्यासाठीही पैसे नव्हते. नुकतेच त्यांनी इंडस्ट्रीमधील आपल्या मित्रांकडेही मदतीचे आवाहन केले होते.
सतीश कौल यांनी इंडस्ट्रीमध्ये मदत मागत म्हटले होते की, “माझ्यामध्ये अजूनही अभिनयाची आग आहे. मला कोणीतरी काम द्यावी, असे मला वाटते. जेणेकरून मी काही रुपये कमावू शकेल आणि एक घर विकत घेऊन आरामात जगू शकेल.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कॉम्प्लॅन गर्ल’ आयशा टाकियाचा एका शस्त्रक्रियेने बदलून टाकलाय चेहरा, आज ओळखणंही जातंय कठीण