Monday, July 1, 2024

‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर स्टारर चित्रपट ‘दिल तो पागल है’ ३१ ऑक्टोबर १९९७ रोजी प्रदर्शित झाला होता. यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारनेही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. २४ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता. या संगीतमय चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला. एवढेच नाही, तर उत्कृष्ट कोरियोग्राफीसाठी श्यामक दावर यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रत्येक चित्रपटाच्या मेकिंग आणि कास्टिंगचे रंजक किस्से असतात, जे अनेकदा ऐकायला मिळतात. या चित्रपटातही सहाय्यक अभिनेत्रीची निवड करणे चित्रपट निर्मात्यासाठी मोठी अडचण ठरल्याचे बोलले जाते.

यश चोप्रा यांनी ‘दिल तो पागल है’ चित्रपट बनवायचे ठरवले तेव्हा शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित हे फायनल होते, पण सहाय्यक अभिनेत्री मिळू शकली नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे माधुरी दीक्षितसोबत चित्रपटात काम करण्याची रिस्क घ्यायला कोणतीही अभिनेत्री तयार नव्हती. माधुरीसोबत काम करण्याची कोणाची हिंमत नव्हती. दुसऱ्या लीडसाठी यशची पहिली पसंती जुही चावला होती, पण जुहीने दुसऱ्या लीडची भूमिका करण्यास स्पष्टपणे नकार दिला. जुहीनेही तोपर्यंत हिट चित्रपट देऊन आपले खास स्थान निर्माण केले असल्याने, तिने माधुरीसोबत सेकंड लीडची ऑफर स्वीकार केली नाही.

जुही चावलाने नकार दिल्यानंतर यश चोप्रा अडचणीत आले. माध्यमांतील वृत्तावर विश्वास ठेवला, तर यश यांनी जुही चावलानंतर रवीना टंडनला ऑफर दिली. गोष्टी जमल्या नाहीत, तर काजोल, मनीषा कोयराला आणि नंतर शिल्पा शेट्टी यांनाही ऑफर देण्यात आली. पण सर्वांनी साफ नकार दिला. अशा परिस्थितीत जेव्हा यश चोप्रा यांनी करिश्मा कपूरशी चर्चा केली, तेव्हा करिश्माने ‘दिल तो पागल है’मध्ये काम करण्यास होकार दिला. तेव्हा यशने सुटकेचा श्वास सोडला. करिश्मानेही अप्रतिम अभिनय करून यश यांना खूश केले आणि जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा सहाय्यक अभिनेत्री निशाची भूमिका प्रेक्षकांना आवडली. चित्रपट क्रिटिक्सनेही खूप कौतुक केले. ‘दिल तो पागल है’मध्ये निशाची भूमिका साकारण्यासाठी करिश्माला सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही खूप गाजली होती. ‘दिल तो पागल है’ हा यश चोप्राच्या चित्रपट कारकिर्दीतील एक यशस्वी संगीतमय चित्रपट ठरला. यश चोप्रा यांनी या चित्रपटाचे संगीत यशस्वी करण्यासाठी काही कमी प्रयत्न केले नसल्याचे सांगितले जाते. यामागेही एक रंजक घटना आहे.

https://www.instagram.com/p/CVp_O2BMjMK/?utm_source=ig_web_copy_link

चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक उत्तम सिंग होते. असे म्हटले जाते की, उत्तम यांनी सुमारे १०० ट्यून कथन केले, त्यानंतर यश चोप्रा यांनी अंतिम रूप दिले. या सुरांवर चित्रपटाची गाणी बनवली गेली, जी सुपर डुपर हिट ठरली. चित्रपटाचे शीर्षक गीत असो किंवा ‘अरे रे अरे रे क्या हुआ’, किंवा ‘भोली सी सूरत’, ही गाणी आजही संगीतप्रेमींना आवडतात. लता मंगेशकर यांचा आवाज आणि श्यामक दावर यांच्या कोरियोग्राफीने रुपेरी पडद्यावर संगीताने धमाल केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पत्रकाराने दिली शाहरुखला भारत सोडून पाकिस्तानमध्ये शिफ्ट होण्याची ऑफर, पाकिस्तानला गरीब म्हणत ट्रोलर्सने सांगितला शाहरुखचा खर्च

-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?

हे देखील वाचा