Wednesday, July 3, 2024

बाबाे! चारू असोपाची गरोदरपणात पतीनं केली फसवणूक; अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा

अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन यांच्यातील वाद दिवसेंदिवस बिघडतच चाला आहे. अलीकडेच दोघे अधिकृतपणे घटस्फोट घेण्याबाबत बाेले हाेते. याआधीही दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मुलगी जियानासाठी दोघेही एक झाले होते. पण दोघेही 1 महिन्यापेक्षा जास्त काळ हे नातं टिकवू शकले नाही आणि दिवाळीपूर्वी दोघे वेगळे झाले. विभक्त झाल्यानंतर चारू लहान मुलीसाेबत तिचे मूळ गाव भिलबारा येथे गेली आणि सध्या ती तिथेच राहते. या दरम्यान, चारूने एका मुलाखतीत राजीवबद्दल मोठा खुलासा केला आहे.

चारू असोपा (Charu Asopa) हिने सांगितले की, ती केवळ दिखाव्यासाठी आणि लाेक काय म्हणतील हा विचार करून या वैवाहिक नात्यात राहू शकत नाही. तिने राजीव सेनवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ती म्हणते की, “ती गरोदर असताना राजीवने तिची फसवणूक केली. राजीव सकाळी अकरा वाजता घरातून बाहेर पडत असे आणि रात्री 11 वाजेपर्यंत घरी येत असे. एके दिवशी राजीवच्या बॅगेत एक वस्तूही सापडली, ज्यावरून तिला समजले की, राजीव आपली फसवणूक करत आहे.”

चारू हिने माध्यमांशी बाेलताना एका मुलाखतीत सांगितले की, “काही महिने बिकानेरमध्ये राहिल्यानंतर मी मुंबईला परतले आणि माझ्या गर्भधारणाचा जास्त वेळ मुंबईत घालवला. ते गोरेगाव पूर्वेला सकाळी 11 वाजता त्यांच्या वांद्रे येथील जिमसाठी निघायचे आणि रात्री 11 वाजता, कधी 7, 8 किंवा 9 वाजता घरी परतायचे. जेव्हा मी त्याला विचारले की, त्याला इतके तास का लागले, तेव्हा तो नेहमी म्हणायचा, ‘जेव्हा मी मॅप्सवर ट्रॅफिक पाहतो, तेव्हा मी बांद्राच्या कॅफेमध्ये कॉफी पितो आणि ट्रॅफिक कमी होण्याची वाट पाहतो आणि मग मी घरी येण्यासाठी बाहेर निघताे”

चारू पुढे म्हणाली, “माझाही यावर विश्वास होता. कधी तो गाडीत झोपतो असे सांगायचा तर कधी इतर कारणे सांगायचा. एकदा तो न विचारता दिल्लीला गेला. मात्र, एकदा मी काही सामान हलवत होतो आणि तेव्हा मग मला त्याच्या बॅगेत काहीतरी सापडले, ज्याद्वारे मला कळले की, तो माझी फसवणूक करत आहे. मी हे सर्वांना सांगितले आणि संपूर्ण कुटुंबाला याची माहिती होती. जेव्हा हे घडले तेव्हा मला वाटायचे की, मी येथे राहणार नाही आणि निघून जाईन. पण मग मी नेहमी त्यांना संधी देण्याचा आणि नव्याने सुरुवात करण्याचा विचार केला. लग्नाचे 3.5 वर्षे आयुष्याची नवीन सुरुवात करण्यात निघून गेले.”

चारु आणि राजीव 2019मध्ये लग्न बंधनात अडकले हाेते. त्या दाेघांनी सर्वांच्या संमतीने प्रेमविवाह केला हाेता. पण लग्नानंतर काही महिन्यांनीच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. तेव्हापासून राजीव आणि चारूने एकमेकांना अनेक संधी दिल्या, पण दुर्दैवाने दोघांचे लग्न टिकू शकले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल 3 वर्षानंतर प्रियंकाचे भारतामध्ये आगमन, आल्याबरोबर व्यक्ती केली भावनिक पोस्ट

‘वयाच्या 12 व्या वर्षापासून करतेय बॉडी शेमिंगचा सामना’, अभिनेत्री केला मोठा खुलासा

हे देखील वाचा