Monday, July 1, 2024

नवरा- बायकाेच्या भांडणात नंदेनं केलं दुर्लक्ष; अभिनेत्री म्हणाली, ‘ताईनं कधीच नातं…’

अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले आहेत. दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. सोशल मीडिया आणि मुलाखतींच्या माध्यमातून दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी चारूने ती गरोदर असताना राजीवने तिची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या व्यतिरिक्त माध्यमांशी बाेलताना चारुने अनेक खुलासे केले.

मात्र, त्यानंतर राजीव (rajeev sen) यांने चारू हिच्यावरही गंभीर आरोप केले. लग्नानंतरही चारू (charu asopa) हिचे अभिनेता करण मेहरा (karan mehra) सोबत अफेअर असल्याचा दावा त्यांनी केला. दोघांनी रोमँटिक रीलही केल्या होत्या. चारूच्या आईने स्वतः चारू आणि करणच्या अफेअरबद्दल सांगितलं होतं असा दावाही राजीवने केला. या सगळ्यात राजीवची बहीण आणि अभिनेत्री सुष्मिता सेन (sushmita sen) हिच्या मौनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चारू असोपा हिने एका मुलाखतीत खुलासा केला की, “सुष्मिता सेनने तिला नेहमीच तिच्या आनंदाला प्राधान्य देण्यास सांगितले आहे.” सुष्मिताने त्यांना त्यांचे वैवाहिक संबंध सुधारण्यास सांगितले का असे विचारले असता. यावर चारू म्हणाली, “नाही, त्याने असे कधीच सांगितले नाही. त्यांनी आम्हाला कधीच ते सुधरावयला सांगितले नाही. पहिल्या दिवसापासून त्यांनी मला नेहमी माझ्या आनंदाला प्राधान्य देण्यास सांगितले आहे.”

चारू पुढे म्हणाली, “माझ्या आई-वडिलांनी सांगितले आहे की, विवाहित आयुष्य सुरळीत चालले पाहिजे आणि आपण मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण दीदी (सुष्मिता सेन) कधीच नाही म्हणाली नाही. ती नेहमी म्हणायची की, ‘जर तुम्ही आनंदी नसाल तर जे तुम्हाला सुखी ठेवेल ते करा.’ मी त्यांना कधीच आमच्या नात्यात हस्तक्षेप करण्यास जास्त त्रास दिला नाही. मात्र, त्या कुटुंबातील सदस्य आहे, त्यांना सर्व गाेष्टीची माहिती असने आवश्यक आहे.”

चारू आसाेपा पुढे म्हणाली, “मी या गोष्टींबद्दल माझ्या सासरच्यांना फोनही करत नाही आणि त्यांना सांगतही नाही कारण ते खूप वृद्ध आहे आणि त्यांना आरोग्याच्या समस्या आहेत. ‘मी अडचणीत आहे, प्लीज मला मदत करा’ असे सांगून मी कधीच कोणाला त्रास दिला नाही. मी जेव्हाही दीदींशी याबद्दल बोलायचे तेव्हा त्या मला म्हणायच्या, ‘तुम्ही एकत्र आनंदी राहू शकत असाल तर एकत्र राहा पण आनंदी असाल तर नाहीतर वेगळे व्हा.’

चारु आणि राजीव 2019मध्ये लग्न बंधनात अडकले हाेते. त्या दाेघांनी सर्वांच्या संमतीने प्रेमविवाह केला हाेता. पण लग्नानंतर काही महिन्यांनीच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मिली’च्या स्क्रिनिंगमध्ये एथनिक ड्रेसमध्ये दिसली जान्हवी, पण रेखानेच लुटली वाह वाह, पाहा व्हिडिओ

आतापर्यंत बेबी बंप फोटो शेअर केलेल्या सर्व अभिनेत्रींना बिपाशाने टाकले मागे, पाहा बाेल्ड फाेटाे

हे देखील वाचा