एका रिपोर्टनुसार बॉलिवूडमध्ये दरवर्षी लहान मोठे असे १००० पेक्षा अधिक सिनेमे प्रदर्शित होतात. हे सर्वच सिनेमे कमर्शियल हिट होतातच असे नाही. काही सिनेमे फ्लॉप देखील होतात, तर काही सिनेमे प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी त्यांचे नाव कोरतात. अभिनय, कलाकार, गाणी, कथा आदी सर्वच बाबीत उजवे ठरणाऱ्या काही चित्रपटांच्या यादीत एक नाव प्रकर्षाने घेतले जाते ते म्हणजे काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’चे नाव देखील घेतले जाते.
रोहित शेट्टी दिग्दर्शित, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ने नुकतेच आठ वर्षे पूर्ण केले आहे. ८ ऑगस्ट २०१३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांमध्ये जास्त कमाई करणाऱ्याचे रेकॉर्ड बनवले. १०० कोटी पेक्षा अधिक कमाई करणारा हा सिनेमा प्रेक्षकांसह समीक्षकांना देखील खूपच भावला. या निमित्ताने दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. तिने या व्हिडिओतून चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्ये तिने शाहरुख खान आणि रोहित शेट्टी यांना टॅग केले आहे.

या चित्रपटात दीपिकाने साकारलेली ‘मिनाम्मा’ तिची बोलण्याची स्टाइल, बोलण्याची टोन, तिचा अभिनय सर्वांना खूपच भावला. यासर्वांमध्ये शाहरुखला विसरून कसे चालेल. त्याची कॉमेडी, त्याचे टायमिंग हे सर्व खरंच कौतुकास्पद होते. या चित्रपटातील गाणी, संवाद आज देखील लोकांच्या तोंडावर रेंगाळताना दिसतात. आजही त्यांचे संवाद मीम्स म्हणून व्हायरल होताना दिसतात. इतकी या सिनेमाची क्रेझ होती किंबहुना आजही आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने ‘ओम शांती ओम’ सिनेमातून हिट झालेली ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर गाजताना दिसली. या चित्रपटातून पुन्हा एकदा रोहितने तो किती ताकदीचा आणि कमालीचा दिग्दर्शक आहे, हे दाखवून दिले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…