संजय खान (Sanjay Khan) यांनी १९६४ मध्ये चेतन आनंदच्या ‘हकीकत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. संजय यांनी ७० च्या दशकात ‘मेला’, ‘उपासना’, ‘धुंड’ आणि ‘नागिन’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ३ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ३० चित्रपटांमध्ये काम केले. २००० पर्यंत त्यांनी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका केल्या. संजय यांनी अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या मालिकाही दिग्दर्शित केल्या. चित्रपटांव्यतिरिक्त संजय त्यांच्या प्रेमकथेमुळेही चर्चेत आले होते. सोमवारी (३ जानेवारी) संजय त्यांचा ८१वा वाढदिवस साजरा करत आहेत.
संजय यांचा जन्म ३ जानेवारी १९४१ रोजी बंगळुरू येथे झाला. संजय आणि झीनत अमान यांच्या अफेअरचे किस्से त्यावेळी बॉलिवूडमध्ये खूप गाजत होते. झीनत यांनी संजय यांच्याशी गुपचूप लग्न केल्याचेही वृत्त आले होते. त्यांच्या अफेअरचे किस्से ‘अब्दुल्ला’ चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाले. संजय आधीच विवाहित होते आणि त्यांना तीन मुले होती.
का तुटले नाते?
‘अब्दुल्ला’ चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर संजय यांनी झीनत यांना फोन केला आणि त्यांना त्यांच्यासोबत एक गाणे शूट करण्यास सांगितले. पण झीनत खूप व्यस्त होत्या. तारखांच्या कमतरतेमुळे झीनत यांनी शूटला नकार दिला. ज्यानंतर संजय संतापले आणि त्यांनी फोनवरच झीनत यांना बरेच काही ऐकवले. झीनत जेव्हा संजय यांच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांना कळाले की, संजय ताज हॉटेलमध्ये पार्टीला गेले होते. त्यानंतर झीनत घाबरत तिथे पोहोचल्या.
३ नोव्हेंबर १९७९ रोजी घडली होती ‘ही’ घटना
संजय यांची समजूत घालण्यासाठी झीनत ताज हॉटेलमध्ये पोहोचल्या तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी संजय यांनी झीनत यांना संपूर्ण स्टाफसमोरच मारहाण केली. झीनत यांचा जबडा तुटला आणि उजव्या डोळ्याची दृष्टी गेली. या घटनेनंतर झीनत यांनी संजय यांच्यासोबतचे नाते पूर्णपणे संपवले. संजय यांनी त्यांच्या ‘द बिग मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ या चरित्रात या घटनेबद्दल लिहिले आहे. संजय यांची पत्नी जरीन खोलीतून आली आणि थांबण्याऐवजी पती संजय यांना चीयर करू लागली.
हेही वाचा-