Friday, July 5, 2024

पती सोबतचे नाते संपल्यावरही बॉलीवूड सारख्या मायाजाळात खंबीरपणे उभ्या राहिल्या या ५ अभिनेत्र्या

मनुष्याच्या जीवनाला केव्हा कलाटणी मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही. सामान्य माणूस असो अथावा सेलिब्रिटी, प्रत्येकालाच जीवनात संघर्ष करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विवाह हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो , जीवनातील आनंद व दुःख या दोन्ही प्रसंगी आपल्या जोडीदाराची साथ अतिशय गरजेची असते. अनेक लोक जेव्हा जोडीदाराची साथ तुटते तेव्हा जीवनात नैराश्य ग्रस्त होवून हार मानतात , पण आज आपण या लेखात बघणार आहोत अशा पाच अभिनेत्री ज्या पती पासून दूर होवूनही जीवनात खंभीर पणे उभ्या आहेत.

१) करिश्मा कपूर

बॉलीवुड मधील प्रसिद्ध अशा कपूर परिवारातील सदस्य आलेल्या करिश्माची चित्रपट कारकिर्द यशस्वी ठरली. अनेक सुपर हिट चित्रपटांमध्ये उत्तम अभिनया द्वारे करिश्माने सिने रसिकांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट क्षेत्रात यशाच्या शिखरावर असतांनाचा करिश्माने बिजनेसमॅन संजीव कपूर सोबत विवाह केला. या विवाहातून करिश्माला दोन मुले देखील आहेत. सुरुवातीची काही वर्ष आनंदात जात असतांना पुढे मात्र या नात्यात कटुता निर्माण झाली. सरतेशेवटी २०१६ मध्ये करिश्माने पतीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. मात्र या कठीण प्रसंगातही हार ना मानता करिश्माने आपल्या दोन्ही मुलांचे योग्य संगोपन केले. मुले मोठी झाल्यानंतर पुन्हा एकदा करिश्माने चित्रपट क्षेत्रात पुनरागमन केले आहे.या वर्षीच्या सुरवातीला तिची ‘ मेंटलहूड’ ही वेब सिरीज प्रदर्शित झाली होती.

२) मलाइका अरोडा

सुप्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री मलाइका अरोडा ने सलमान खान चा लहान भाऊ व अभिनेता अरबाज खान शी विवाह केला होता. मात्र लग्नाच्या १० वर्षांनंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला . मलाइका व अरबाज चा मुलगा देखील मलाइका सोबत राहतो व मलाइका त्याचे योग्य संगोपन करत आहे. अलीकडे मलाइका चे नाव अभिनेता अर्जुन कपूर सोबत जोडले जात आहे.

३) संगीता बिजलानी

प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानी चे नाव सुरुवातीला सलमान सोबत व त्यानंतर दिग्गज भारतीय क्रिकेट खेळाडू व माजी कर्णधार मोहोम्मद अझरुद्दीन सोबत जोडले गेले. अझहर सोबत विवाह केल्यानंतर अनेक वर्ष दोघे एकत्र होते मात्र २०१० साली दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. संगीता सध्या एकटीच आनंदाने जीवन जगत आहे.

४) महिमा चौधरी

बॉलीवुड चा बादशहा शाहरुख खान सोबत काम केलेल्या ‘ परदेस ‘ या सुप्रसिद्ध चित्रपटामुळे महिमा प्रकाशझोतात आली होती . मात्र अचानक तिने चित्रपट क्षेत्रातून दूर होण्याचा निर्णय घेत सन २००६ साली बॉबी मुखर्जी सोबत विवाह केला. मात्र त्यांच हे नात केवळ सात वर्ष च टिकू शकल. महिमा सध्या आपल्या मुला सोबत आनंदात जीवन जगत आहे. अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये ती दिसत असते.

५)मनिषा कोईराला

नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला ने बिजनेसमॅन सम्राट दहल सोबत विवाह केला. मात्र विवाहाच्या केवळ दोन वर्षांनंतरच दोघेही विभक्त झाले. अनेक वर्ष सिने क्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर मनिषा ने मागील वर्षी ‘प्रस्थानंम ‘ या चित्रपटात काम केले. या वर्षी तिची ‘ मस्का ‘ ही वेब सिरीज देखील प्रदर्शित झाली आहे.

हे देखील वाचा