केंद्र सरकारने नुकतीच ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत लष्करात नोकरी मिळण्यासाठी नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र, हा बदल तरुणाईला पसंत पडलेला नाही. त्यामुळे तरुणमंडळी सरकारी मालमत्तेचे नुकसान करून, त्याविरोधात सातत्याने निदर्शने करत आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) आपल्या बाजूने एक विधान करून या गोंधळ करणाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत कंगना रणौतने लिहिले की, “इस्रायलसारख्या अनेक देशांनी त्यांच्या सर्व तरुणांसाठी सैन्य प्रशिक्षण अनिवार्य केले आहे. या अंतर्गत प्रत्येक तरुणाला काही वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाते आणि शिस्त, राष्ट्रवाद यांसारखी जीवनमूल्ये शिकवली जातात. सोबतच देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी या शब्दांचा अर्थ काय, हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला जातो. अग्निपथचा अर्थ रोजगार किंवा पैसे कमावण्याचे साधन नाही. त्याचा अर्थ खूप खोल आहे.” (agneepath scheme kangana ranaut came in favour of central government)
कंगना पुढे म्हणते, “जुन्या काळी प्रत्येकजण गुरुकुलमध्ये जात असे, हे जवळपास असेच आहे. मात्र आता त्यांना तसे केल्याचे पैसेही मिळतील. अंमली पदार्थ आणि पबजीच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होत असलेल्या तरुणांना या योजनेची गरज आहे. यासाठी सरकारचे कौतुक केले पाहिजे.”
अग्निपथ योजना काय आहे?
या योजनेंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठी सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. केवळ १७ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांनाच अग्निपथ योजनेचा लाभ घेता येईल. मात्र, यंदा तरुणांना वयोमर्यादेत दोन वर्षांची सूट देण्यात आली आहे. म्हणजेच २३ वर्षांपर्यंतचे तरुण २०२२ मध्ये होणाऱ्या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतील. तसेच, या प्रणालीमध्ये निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी किंवा पेन्शनची तरतूद नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा