Friday, July 5, 2024

लग्न मंडपातच रणबीर कपूरने केले होते ‘हे’कृत्य,आलियाने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांना बॉलिवूडचे क्यूट कपल म्हटले जाते. दोघांनी यावर्षी एप्रिलमध्ये एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर लगेचच दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले. अशा परिस्थितीत त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची संधी चाहत्यांना क्वचितच मिळाली असेल. त्याचवेळी आलिया भट्ट करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 7’ या शोमध्ये पोहोचली होती, जिथे तिने अनेक धक्कादायक खुलासे केलेले पाहायला मिळाले. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. लग्नानंतर पहिल्यांदाच आलियाने रणबीर कपूरबद्दल अनेक महत्वाचे खुलासे केले. करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये आलिया भट्टने तिच्या प्रेमकथेच्या सुरुवातीपासून तिच्या प्रपोजल डेस्टिनेशनपर्यंत अनेक गोष्टी शेअर केल्या. या गुपितांबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल. या सगळ्या दरम्यान आलियाने सांगितले की रणबीर कपूर खूप पारंपारिक आणि धार्मिक आहे. लग्नाच्या वेळीही रणबीर पंडितजींच्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होता. आलियाच्या म्हणण्यानुसार, सूर्यास्त होत असताना ती लग्नाचे विधी पूर्ण होण्याची वाट पाहत होती आणि तिला फोटोशूट करायचे होते. दरम्यान, रणबीरने पंडितजींना ‘थोडे समजावून सांगा’ असे सांगितले. आलियाच्या या गोष्टींचा साक्षीदार स्वतः करण जोहर आहे, जो लग्नाच्या विधीवेळी तिथे उपस्थित होता.

रणबीर कपूर नेहमीच त्याच्या मस्त डॅशिंग स्टाईलमध्ये दिसतो. ते स्वभावाने कसे आहेत, हे या शोमध्येच कळू शकले. त्याच्या शोमध्ये खुलासा करताना करणने सांगितले की, आलिया वधूच्या रुपात प्रवेश करत होती तेव्हा तिला पाहून रणबीर भावूक झाला होता. रणबीर आलिया पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मसाई मारा या चित्रपटात रणबीरने आलियाला लग्नासाठी प्रपोज केले होते. दोघांनी 14 एप्रिल रोजी कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न केले.

हे देखील वाचा