कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) सध्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान भारतभ्रमंती करत आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी जनतेला ते संबोधित करताना दिसतात. अशातच, एका भाषणादरम्यान, राहुल गांधी यांनी बच्चन परिवाराच्या नावाचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी केलेली पोस्ट अन् लिहलेला ब्लॉग चांगलाच चर्चेत आला आहे. राहुल गांधींना बिग बींनी सडेतोड उत्तर दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. तसेच त्यांनी एक ब्लॉगही लिहिला आहे. , ”मी माझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शाररिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे. वर्कआऊटची ही वेळ आहे. शरीराची अन् मेंदूची कार्यक्षमता वाढविण्याचा हा प्रयत्न असून बाकी सगळे वाट पाहत आहेत.” अशा आशयाची पोस्ट अमिताभ यांनी केली आहे.
T 4929 – time for work out .. mobility of the body .. flexibility of the mind .. all else can wait ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 21, 2024
तर ब्लॉगमध्ये, ऱ्याच दिवसांपासून प्रोफेशनल जर्नीमध्ये राहिलो आहे. मोठ्या काळापासून सारखे काम सुरु आहे. मात्र आपला हा प्रवास सुरुच राहतो. तो प्रवास कमी व्हावा असे आपल्याला वाटू नये यासाठी सतत कार्यशील राहणे गरजेचे आहे. कुणीही आपल्याला काहीही सांगू आपली लढाई ही आपल्याला लढावी लागेल. आपण प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. काहीजण आपल्याविषयी बोलतील त्या शुभचिंतकांच्या समर्थनासह आपण आपली वाटचाल करत राहणे जास्त महत्वाचे आहे. असेही बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
त्यांच्या या पोस्ट ब्लॉगनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. अमिताभ यांनी त्यांच्या ट्विट ब्लॉगमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण चाहत्यांमध्ये बिग बींनी राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिले असल्याचे बोलले जात आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहूल गांधी (Rahul Gandhi ) यांनी काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे जनतेला संबोधित करताना भाजपावर टिका केली. १२ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी छत्तीसगडमध्ये जनतेला संबोधित करताना म्हणाले, “तुम्ही राम मंदिराचे उद्घाटन पाहिले असेल. त्यात तुम्हाला गरीब माणूस दिसला का? मी अमिताभ बच्चन यांना पाहिले. ऐश्वर्या राय दिसली. अदानी दिसले. अंबानी दिसले, सर्व उद्योगपती दिसले. मला त्याच्यात गरीब माणूस दिसला नाही. मला तिथे एकही शेतकरी, मजूर, बेरोजगार, चहा विकणारा किंवा छोटा दुकानदार दिसला नाही. प्रत्येकाकडे अब्जाधीश म्हणून पाहिले जात होते.
यानंतरही राहुल गांधी दुसऱ्या एका रॅलीदरम्यान माध्यमांवर टीकास्त्र सोडले. ‘माध्यमं आमचा दृष्टिकोन दाखवत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला २४ तास मीडियामध्ये दिसतील. ऐश्वर्या रॉय नाचताना दिसेल. अमिताभ बच्चन मोदींच्या बाजूला फिरताना दिसतील.
…अन् ट्विंकलवर भडकली कंगना रणौत; काय आहे प्रकरण?
बिग बॉस १६ फेम शिव ठाकरे अन् अब्दु अडचणीत; ED ने बजावलं समन्स