Tuesday, July 9, 2024

प्रेमात आंधळी झालेल्या अंकिताला सुशांतपुढे दिसत नव्हते तिचे करिअर, लग्नासाठी ‘या’ चित्रपटांच्या ऑफरही लावल्या होत्या धुडकावून

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला आज जवळपास नऊ महिने उलटून गेले आहेत. तरीही त्याचे चाहते त्याच्या या दुःखातून बाहेर आलेले नाहीत. त्याच्या मृत्यूचा त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. याव्यतिरिक्त जास्त दुःख कोणाला झाले असेल, तर ती त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला. भले ही अंकिता आणि सुशांतचा ब्रेकअप झाला असेल. पण सुशांत सिंगच्या मृत्यूची बातमी ऐकून तिला खूपच धक्का बसला होता. आजही त्याच्या आठवणीत ती भावुक होताना दिसते.

अंकिताने नुकत्याच झालेल्या तिच्या एका मुलाखतीत सुशांत सिंग सोबतच्या अनेक गोष्टींचा आणि त्याच्यासोबत घालवलेल्या अनेक क्षणांचा खुलासा केला आहे. एवढेच नाही, तर तिने हेदेखील सांगितले की, सुशांत सिंग सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने तिने बॉलिवूडमधील अनेक मोठे चित्रपट करण्यास नकार दिला होता.

अंकिताने मुलाखतीत सांगितले की, तिला अनेक मोठ्या चित्रपटांची ऑफर आली होती. परंतु फक्त सुशांतसाठी तिने ते चित्रपट करण्यास नकार दिला. तिने शाहरुख खानचा ‘हॅप्पी न्यू इअर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ या चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला होता. कारण तिला वाटत होते की, तिच्या आधी सुशांतला चांगले काम मिळावे, आणि त्याने यशस्वी व्हावे.

या मुलाखतीत तिने सांगितले की, “मी सुशांतसाठी अनेक गोष्टी सोडून दिल्या. मला आजही आठवतंय ‘हॅप्पी न्यू इअर या चित्रपटासाठी फराह मॅम यांनी ऑफर दिली होती. मी जेव्हा शाहरुख सरांना भेटले, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, मी तुला बॉलिवूडमध्ये चांगला डेब्यू देणार आहे. परंतु मला मनातून फक्त सुशांतचा विचार येत होता. मुली कशा असतात ना, त्यांच्या आधी त्यांच्या जोडीदाराचा विचार करतात.”

यानंतर अंकिता म्हणते की,  “संजय लीला भन्साली सरांनी मला जेव्हा ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाची ऑफर दिली होती, तेव्हा मी त्यांना नाही असे म्हणले होते. संजय सर मला म्हणाले होते की, तू हा चित्रपट कर नाहीतर नंतर जाऊन तुला पश्चात्ताप होईल. परंतु मी त्यांना तोंडावर म्हटले, नाही सर मला आता लग्न करायचं आहे. मला आठवतंय माझ्या या उत्तरानंतर त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नव्हते.”

अंकिता आणि सुशांतच्या जोडीला पवित्र ‘रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेने खूप ओळख आणि प्रेम दिले. त्यांच्या मानव आणि अर्चना या पात्राने त्यांना घराघरात नेऊन पोहोचवले. केवळ ऑनस्क्रीन नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही ते एकमेकांच्या प्रेमात होते. सात वर्षांच्या नात्यानंतरही ते दोघे वेगळे झाले. आणि त्यांच्या नात्याचा शेवट झाला.

अंकिताने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘बागी 3’ मध्ये देखील दिसली होती. या चित्रपटात तिने टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्यासोबत काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

-पांढऱ्या रंगाच्या चादरमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसली टॉपलेस, फोटो शेअर करत म्हणतेय ‘वो पहला प्यार’

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

हे देखील वाचा