बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने आज सिनेसृष्टीमध्ये अभिनयाच्या जोरावर मोठे नाव कमावले. या सिनेसृष्टीला त्याने अनेक यशस्वी आणि हिट चित्रपट दिले आहेत. तो नेहमीच त्याने त्याच्या आयुष्यात मिळवलेल्या या यशाचे श्रेय तो आई मोना कपूर यांना देतो. साल २०१२ मध्ये मोना यांचे निधन झाले. अनेकदा मुलाखतीमध्ये तो त्याच्या आईचा उल्लेख हमखास करतो. नुकतीच त्याने एका मोठ्या मासिकाला मुलाखत दिली. यावेळी त्याने मोना कपूर यांनी त्याला कसा पाठिंबा दिला या विषयी सांगितले.
तो म्हणाला की, “माझी आई ही फक्त माझी आई नव्हती ती माझी एक चांगली मैत्रीण देखील होती. मला आईवर खूप विश्वास होता. कदाचित ती एकटीच अशी व्यक्ती होती जी माझी खूप काळजी घेत होती. आता माझ्याकडे माझ्या दोन बहिणी आहेत. त्या दोघी माझी काळजी घेतात.”
तसेच पुढे त्याने आई व्यतिरिक्त त्याच्या आयुष्यातील काही खास महिलांविषयी सांगितले तो म्हणाला की, “माझ्या आयुष्यात काही चांगल्या मनाच्या महिला देखील आहेत. ज्यामध्ये माझ्या सहकलाकार असणाऱ्या परिणीती चोप्रा आणि आलिया भट्ट या दोघी देखील सामील आहेत.”
बोनी कपूर आणि त्यांचा मुलगा अर्जुनचे कधीच एकमेकांसोबत पटले नाही तसेच अर्जुन त्याच्या सावत्र बहिणींबरोबर देखील कधी बोलत नव्हता. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनावर जास्त जबाबदारी आली. एका मुलाखतीमध्ये जान्हवी कपूरने सांगितले होते की, “आम्ही अनेकदा भेटलो होतो पण कधी आमच्यात बोलणे झाले नाही. मला माझ्या कुटुंबाकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. आमच्या दोघांचे वडील एकच आहेत. आमचं एकच रक्त आहे.”
अर्जुनच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास नुकताच तो ‘भूत पुलिस’ या चित्रपटामध्ये झळकला होता. या सिनेमात त्याच्यासोबत सैफ अली खान, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिस देखील होते. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सनी आणि बॉबी या सावत्र मुलांसोबत कसे आहे हेमा मालिनी यांचे नाते, स्वतः ड्रीमगर्लनेच केला होता खुलासा
–अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका
–नुसरत जहाँ अन् यश दासगुप्ताने गुपचूप उरकलंय लग्न? पुन्हा दिली अभिनेत्रीने ‘हिंट’