बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांनी 60 आणि 75 च्या दशकापासून आपल्या दमदार अदाकारिने अभिनय क्षेत्रात आपली एक वेगळीच छाप सोडली आहे. त्यांनी 10 वर्षाची असताानाच अभिनयामध्ये आपले पाय रोवले होते. त्यांच्या अदाकारिचे आजही चाहते घायाळ आहेत. त्यांना नुकतंच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी दिलेल्यी जयोगदानाला अनमोल पुरस्काराने त्यांचे कौतुक केले आहे. आशा पारेख चांगल्या अभिनेत्रीसोबत एक प्रशिक्षित नृत्यांगना आहेत.
माध्यमातील वृत्तानुसार आशा पारेख यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना बॉलिवूडबद्दल काही प्रश्न विचारले होते. तेव्हा त्यांनी आताच्या बॉलिवूड इंडस्ट्रीवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, बॉलिवूड आता भारताच्या संस्कृतील जपत नाहीत, खासकरुन डान्सच्या बातीत. त्यांना वाटत आहे की, आजची नवी पिढी भारताच्या संस्कृतीला विसरली आहे. त्यांनी चित्रपट निर्मात्यांनाही फटकार लावत लीला भन्साळी यांना वेगळे असल्याचे सांगितले. सोबतच आशाजींनी सध्या ट्रेडिंग चलणाऱ्या रिमिक्स गाण्यावरही आक्षेप व्यक्त केला आहे.
आशा पारेख यांनी सांगितले की, “आपण आपल्या भारतीय नृत्याला विसरले आहेत आणि वेस्टर्ण डान्सच्या मागे पडले आहेत. ज्या प्रकारचा डान्स आपण बघत आहोत, ती आपली स्टाईल नाही. ती आपली संस्कृती नाही. डांन्सची आपली एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे, प्रत्येक राज्याचा एक डांस असतो आणि आपण काय करत आहोत? आपण वेस्टर्ण डान्स करण्याचा प्रयत्न करत आहोत. कधी कधी असे वाटत आहे की, आपण डान्स नाही तर एक वेगळ्या प्रकारचा व्यायाम करत आहेत. हे पाहुन माझे मन खुप दु:खी होत आहे.”
आशा पारेख पुठे बोलतच होत्या, “सगळ्या दिग्दर्शकांपैकी संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) यांच्या कामामध्ये मला वेगळेपणा दुसून येतो. त्यांच्या कामामध्ये भारतीय संस्कृतीच्या प्रतिमांना दाखवत असतात.” सोबतच अभिनेत्रीने आपल्या रिमेक गाण्याला भयानक म्हणत त्यांनी सांगितले की, “आपण खऱ्या गाण्याच्या सुंदरतेला लाउड ड्रम आणि बीट्सने खराब करुन टाकत आहोत. शब्द हरवले आहेत.” आपल्या भारतीय अभिनय क्षेत्रात 22 वर्षामध्ये असे पहिल्यांदा होत आहे की, दादा साहेब फाळके पुरस्कार एका महिला अभिनेत्रीला मिळत आहे. हा पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये खूप मान्यता देत आहे.
अभिनेत्रीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात खूप कमी वयातून केली होती. अगदी 10 वर्षाची असताना त्यांनी ‘आसमान’ या चित्रपटामधून केली होती. त्यानंतर त्यांनी 1959 मध्ये ‘दिल देके देखो’ चित्रपटामध्ये शम्मी कपूर (Shammi Kapoor) सोबत मुख्य भुमिकेत काम केले होते. यांच्या जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. आशा यांनी आपल्या करिअरमध्ये 50 वर्षापेक्षाही जास्त वय होत असताना एकूण 95 चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांनी कांरवा, कटी पतंग, तीसरी मंजील, बाहारों के सपने आणि प्यार का मौसम सारक्या अनेक प्रसिद्ध चित्रपटामध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शिल्पी राजच्या ‘बेचब बीडी पान’ गाण्यानं युट्यूबरवर घातलाय राडा; पाहा व्हिडिओ
चिरंजीवी यांच्या ‘गॉडफादर’ चित्रपटात सलमान खानने गाडला झेंडा, व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने केले कौतुक