Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड ‘म्हणून माझा पहिला चित्रपट माझ्यासाठी शाप’, आयुष्मान खुरानाने सांगितलेले कारण ऐकून बसेल धक्का

‘म्हणून माझा पहिला चित्रपट माझ्यासाठी शाप’, आयुष्मान खुरानाने सांगितलेले कारण ऐकून बसेल धक्का

आयुषमान खुराना हा बॉलिवूडमधील एक प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच आयुष्मानच्या नावाची सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये तुलना केली जाते. अलिकडेच अभिनेता आयुषमान खुरानाने त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 

आयुष्मान खुराना (ayushmann khurrana)  एक बहुगुणसंपन्न अभिनेता आहे हे सर्वांनाच माहीत आहे. अभिनेता होण्याआधी त्याला मोठा संघर्ष करावा लागला. 2004 मध्ये, आयुष्मान रोडीज या रिअलिटी शोचा एक भाग बनला, बॉलीवूडमध्ये त्याच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी त्याने अँकरिंग देखील केले. आयुष्मानची मेहनत कामाल आली आणि 2012 मध्ये त्याला विकी डोनरची ऑफर मिळाली. या चित्रपटानंतर आयुष्मानने अनेक चित्रपट केले पण त्याला यश मिळवता आले नाही. अशा परिस्थितीत आयुष्मान त्याच्या पहिल्या चित्रपटाला शाप मानतो.

आयुष्मान खुराना हा चंदीगडचे प्रसिद्ध ज्योतिषी पी. खुराना यांचा मुलगा आहे. त्याच्या वडिलांनी त्याला सर्व प्रकारचे सर्जनशील काम करता येईल असे स्वातंत्र्य दिले होते. आयुष्मानने त्याच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. तो पहिल्यांदा एमटीव्ही रोडीजमध्ये दिसला होता. रोडीजच्या दुसऱ्या सीझनचा विजेता झाल्यानंतर आयुष्मानने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर आयुष्मानने एका रेडिओ चॅनलमध्ये आरजे म्हणूनही काम केले. अनेक चॅनेल्सवर अँकरिंग करून तो घराघरात नावारूपाला आला. आयुष्मानने 2012 मध्ये विकी डोनर या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

या चित्रपटात आयुष्मानने पाणी दा रंग हे गाणे गायले होते, ज्यासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कारही मिळाला होता. यावर्षी अनेक अवॉर्ड शोमध्ये आयुष्मानचा डंक वाजवताना दिसला. मात्र, त्यानंतर आयुष्मानचे नौटंकिसाला, स्टुपिडीटी आणि हवाई हे तिन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. आयुष्मानने त्यावेळी एका मुलाखतीत सांगितले होते की, “त्याचा पहिला चित्रपट त्याच्यासाठी शाप ठरला होता. इतका उच्च मापदंड त्या चित्रपटातून मांडला गेला की लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या. अशा परिस्थितीत माझे बाकीचे चित्रपट फ्लॉप गेले.” त्यानंतर 2015 मध्ये आयुष्मानचा ‘दम लगा के हईशा’ हा चित्रपट आला, ज्याने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही वाचा- रणवीर सिंगच्या ‘त्या’ कृत्याने जिंकली चाहत्यांची मने, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव
‘ब्रह्मास्त्र’मध्ये देवची भूमिका रणवीर सिंग साकारणार का? करण जोहर लाइव्ह चॅटमध्ये म्हणाला, ‘आम्ही हिरो…’
ब्रेकिंग! सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावला गळफास

हे देखील वाचा