Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड प्रेमासाठी वाट्टेल ते!!! बॉलीवूड विश्वातील असे कलाकार, ज्यांनी पळून जावून केले होते लग्न

प्रेमासाठी वाट्टेल ते!!! बॉलीवूड विश्वातील असे कलाकार, ज्यांनी पळून जावून केले होते लग्न

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्या चित्रपटातील हीरो हीरोइन एकमेकांवर प्रेम करत असतात, पण त्यांच्या घरच्यांना ते प्रेम मान्य नसते. अनेक वेळा त्यांच्या घरचे त्यांना एकमेकांपासून लांब करतात, तर अनेकवेळा हेच प्रेमी त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी घरातून पळून जाऊन एकमेकांची साथ देतात. अशी केवळ चित्रपटांची स्क्रीप्ट नसते तर प्रत्यक्ष कलाकारांच्या जीवनातही अनेक वेळा असं झालं आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या प्रेमासाठी त्यांच्या परिवाराच्या आणि समाजाच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न केले आहे. चला तरी जाणून घेऊया या कलाकारांच्या आयुष्यातील त्यांची खरी प्रेम कहाणी.

आमिर खान- रीना दत्त
आमिर खानला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त गोष्टी सांगायला आवडत नाही. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्याच्या चाहत्यांना जास्त गोष्टी माहीत नसतात. आज आमिर आणि किरणचा संसार अगदी थाटामाटात चाललेला असला, तरी ही गोष्ट अनेकांना माहीत नसेल की, एकेकाळी आमिर रीनाच्या प्रेमात बुडाला होता. ते दोघे शेजारी शेजारीच राहायचे, तेव्हा ते एकमेकांवर प्रेम करू लागले. परंतु त्या दोघांचाही धर्म वेगळा असल्याने त्यांच्या कुटुंबाने आणि समाजाने देखील त्यांचे हे नातं मान्य केलं नव्हतं. त्यावेळी आमिरने गुपचूप रीना सोबत लग्न केले आणि काही दिवसांनी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली. परंतु त्या दोघांचे नाते जास्त दिवस टिकू शकले नाही आणि लग्नाच्या सोळा वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

शशि कपूर-जेनिफर केंडल
अभिनेता शशि कपूरची प्रेम कहाणी खूप फिल्मी आहे. शशी कपूर यांना थेटरमध्ये काम करायला खूपच आवडत असायचे. त्यावेळी त्यांची भेट परदेशी कलाकार जेनिफर केंडल सोबत झाली. त्यावेळी शशी कपूर हे खूप लाजाळू होते, परंतु त्यांनी जेनिफरला बघता क्षणीच त्यांचा तिच्यावर जीव जडला. पण घरचे त्यांच्या लग्नाला कधीच परवानगी देणार नाही, या गोष्टीची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी त्यांनी कुटुंबाचा आणि समाजाचा विचार न करता पळून जाऊन लग्न केले.

भाग्यश्री-हिमालय दास
मैने प्यार किया या चित्रपटात सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत असणारी भाग्यश्री अचानक चित्रपट सृष्टीपासून लांब गेली, तेव्हा सगळेजण हैराण झाले होते. त्यावेळी भाग्यश्रीने वयाच्या एकविसाव्या वर्षी हिमालयसोबत पळून जाऊन लग्न केले होते. तिच्या आई-वडिलांना त्यांचे नाते मंजूर नव्हते, त्यामुळे तिने तिच्या प्रेमासाठी या सगळ्या गोष्टी न जुमानता लग्न केले होते. याच कारणामुळे ती अचानक चित्रपट सृष्टीपासून लांब झाली होती.

सुधा चंद्रन-रवि डांग
टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रनने तिच्या अभिनयाने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. यासोबत तिची प्रेम कहाणी देखील खूप फिल्मी होती. 1994 मध्ये सुधा आणि रविकांत एकमेकांच्या प्रेमात पडले ,त्यावेळी रवी हे एका शोचे सहाय्यक दिग्दर्शक होते. त्यावेळी सुधाचे आई वडील त्यांच्या नात्याच्या विरुद्ध होते. सुधाने कोणाचेही न ऐकता फक्त आपल्या मनाच्या ऐकले आणि रवी यांच्यासोबत पळून जाऊन लग्न केले.

हे देखील वाचा