नुकताच स्काय न्यूजचा एक लेख प्रदर्शित झाला. ज्यामध्ये म्हटले आहे की, प्रदूषणामुळे मानवी जननेंद्रिय संकुचित होत आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करून दियानेही ट्वीट केले. तिने लिहिले की, “आता कदाचित जग #ClimateCrisis आणि #AirPollution ला थोडे अधिक गंभीरपणे घेईल?”
या वर्षाच्या सुरुवातीला दियाने म्हटले होते की, कोविड- १९ सर्व हा एक वेक अप कॉल आणि एक संकटाचा संकेत आहे, जो मनुष्य आणि पर्यावरणामधील असमतोलपणाबद्दल आपण कबूल केला पाहिजे.
तिने म्हटले होते की, “गेल्या काही वर्षांत कृतींचे दुष्परिणाम होतात हे स्पष्टपणे दिसून आले आहे. जर नैसर्गिक आपत्ती आणि साथीच्या रोगाने आपल्याला काहीही शिकवले असेल, तर ते म्हणजे आपण निसर्गाशी कसे वागतो आणि कसे जगतो, याचा आपल्याला पुन्हा विचार करणे आवश्यक आहे.“
“सन २०२१ मध्ये आपण आपल्या निवडीनुसार आपल्या ग्रहाचे अधिक चांगले नागरिक होऊ या. पृथ्वीला बरे होण्यास मदत करण्यासाठी आपल्या सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. आज एक छोटासा बदल करणे फार अवघड नाहीये, ज्याचा आपल्या भविष्यावर कधीही माहिती नसलेल्या एकमेव घरावर एकत्रितपणे आणि सकारात्मक परिणाम होईल,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली.
दियाने मागील महिन्यात म्हणजेच १५ फेब्रुवारी, २०२१ रोजी व्यावसायिक वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली होती. यामध्येही तिने नैसर्गिक वस्तूंचा वापर केला होता.
दियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती अनुभव सिन्हा यांच्या सन २०२० मधील ‘थप्पड’ चित्रपटात शेवटची दिसली होती. आता असे वृत्त आहे की, ती लवकरच ‘वाईल्ड डॉग’ चित्रपटातून तेलुगु चित्रपटसृष्टीत पदार्पण करेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोरोनाने विस्कटले तिचे जीवन; अमिताभ बच्चन, रणबीर कपूरसोबत काम करणारी मुलगी आता विकतेय मोमोज