Wednesday, July 3, 2024

कंगना रणौत इंडस्ट्रीतील कोणालाही तिच्या घरी बोलवू इच्छित नाही! अस का म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री कंगना रणौत हिला पंगा क्वीन म्हणून देखील ओळखले जाते. ती तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे जास्त चर्चेत असते. प्रत्येक गोष्टीवर अभिनेत्री तिचे मत बिनधास्तपणे मांडते. नुकतेच तिने अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचे कौतुक केले होते त्यावरून ती चर्चेत आली होती. कंगना आणि वाद जणू असे समीकरणच झाले आहे. नुकतेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, तुला चित्रपटसृष्टीतील कोणाला घरी बोलवू इच्छिते? यावर कंगना हिने जे उत्तर दिले यावरून ती तुफान चर्चेत आली आहे. चला तर जाणून घेऊ की, तिने नेमकं काय उत्तर दिले आहे?
कंगना रणौत ही वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येते. एका मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला की, “तुला बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला घरी बोलवायला आवडेल अशी 3 नावे. यावर तीने खळबळजनक उत्तर दिले. ती म्हणाली की, या सेवेसाठी बॉलीवुडमधील कोणाचीच लायकी नाही, ज्यांना ती घरी बोलवु शकेल. घरी तर अजिबात नाही बोलवणार. कुठे बाहेर भेटले तर ठीक आहे, पण घरी कोणालाच बोलवू नका.” पुढे तिला विचारण्यात आले की, तुझा कोणी गायक मित्र नाही का? त्यावर तिने उत्तर दिले की, अजिबात नाही. हे लोक माझे मित्र बनण्याच्या लायकीचे नाहीत. माझे मित्र होण्यासाठी पात्रता आवश्यक आहे.”

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘भूल भुलैया’ बनवण्यात आला होता. या चित्रपटात कंगनासोबत साऊथचा मोठा स्टार राघव लॉरेन्स दिसणार आहे. यासोबतच या चित्रपटात लक्ष्मी मेनन आणि वडेवेलू यांच्याही मुख्य भूमिका आहेत. नुकतेच कंगनाने चित्रपटातील तिच्या भागाचे शूटिंग पूर्ण केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

त्यानंतर तिने एक भावनिक पोस्ट देखील केली होती ज्यात तिने चित्रपटाचा सह अभिनेता राघव लॉरेन्सचे कौतुक करताना, तिने म्हटले की, इतक्या दिवसांनी शुटींग पूर्ण केल्यानंतर निरोप घेणे कठीण आहे. (bollywood-actresss-kangana-ranaut-in-interview-ask-question-who-invite-her-house-answer-will-shock)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी तब्बल 300 हून अधिक सिनेमात केलं होतं काम, हे आहेत त्यांचे गाजलेले सिनेमे
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

हे देखील वाचा