Thursday, March 13, 2025
Home साऊथ सिनेमा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबाबत अल्लू अर्जुनने दिली प्रतिक्रिया, ठेवली ‘ही’ मोठी अट

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबाबत अल्लू अर्जुनने दिली प्रतिक्रिया, ठेवली ‘ही’ मोठी अट

अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. ज्याने अनेक हिट चित्रपट देऊन आपल्या चाहत्यांना वेड लावले आहे. अर्थात, तो फक्त दक्षिणेतील चित्रपटांमध्येच दिसतो. पण त्याच्या चित्रपटांमुळे हिंदी प्रेक्षकांमध्येही खळबळ उडाली आहे आणि याच कारणामुळे अल्लू आजच्या काळात बॉलिवूड कलाकारांना स्पर्धा देत आहे. अलिकडेच त्याचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडले होते. अशा परिस्थितीत आता बॉलिवूडचे बडे चित्रपट निर्माते अल्लूसोबत काम करू इच्छितात. पण अल्लू अर्जुन बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार नसल्याचे दिसते आहे. त्याने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये अभिनेता त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलत आहे.

अल्लू अर्जुनने आपल्या मुलाखतीत सांगितले की, त्याला एका चित्रपटाची ऑफर आली आहे पण त्याला ते फारशी आवडली नाही. अभिनेता म्हणाला की, “मला चित्रपटाची ऑफर आली आहे, पण मला ती फारशी आवडली नाही. मी हिंदी चित्रपट करायला तयार आहे पण त्यासाठी फक्त चांगली कथा हवी.” अभिनेत्याने सांगितले की, तो हिंदी चित्रपटांची स्क्रिप्ट निवडेल, ज्यामध्ये त्याला सहाय्यकाची भूमिका करावी लागणार नाही.

अल्लू म्हणाला की, “जर कोणाला माझ्याकडे यायचे असेल तर अशा ऑफर्स घेऊन या, ज्यामध्ये नायक मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय मला कशातच रस नसेल आणि ते नीट समजून घेतले पाहिजे. मला दुसरी भूमिका नको आहे. मोठ्या स्टारला दुसरी भूमिका देण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे चित्रपटाचेच नुकसान होते. म्हणूनच तुम्ही मुख्य नायकाला मुख्य अभिनेता म्हणून नियुक्त केले पाहिजे.”

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना दिसली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींची कमाई केली आहे

हेही वाचा-

हे देखील वाचा