Monday, July 1, 2024

‘इंडियन आयडल १२’ पुन्हा अडचणीत! सुनिधी चौहानचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मला स्पर्धकांचे…’

गायन रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ गेल्या बऱ्याच दिवसांपासून वादविवादांमुळे चर्चेत आहे. अगोदर किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमारने शोबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर शोच्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंतने केलेले विधान चर्चेत आले होते. आता प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिनेही शोबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, तिला स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले गेले होते, ज्यामुळे तिला हा शो सोडावा लागला. तसेच, सुनिधी या शोच्या ५ व्या व ६ व्या सीझनमध्ये जज म्हणून दिसली आहे.

सुनिधी चौहान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, “मला स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले गेले होते. पण सर्वांचेच कौतुक करायचे आहे, असे काही नव्हते सांगितले. ही एक बेसिक गोष्ट होती. म्हणून मी पुढे चालू ठेवू शकले नाही. त्यांना पाहिजे ते मी करू शकलो नाही. म्हणून मी स्वत: ला त्यांच्यापासून वेगळे केले. आज मी कोणत्यात रियॅलिटी शोला जज नाही करत.”

केवळ सुनिधी चौहानच अशी व्यक्ती नाहीये, जिने या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापूर्वी अभिजीत सावंत यानेही दावा केला होता की, निर्माते स्पर्धकांच्या गायन प्रतिभेपेक्षा, त्यांच्या कथांवर जास्त लक्ष केंद्रित करतात.

‘इंडियन आयडल १२’ या शोसंदर्भात वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा किशोर कुमार विशेष एपिसोडमध्ये त्यांचा मुलगा अमित कुमार पाहुणे म्हणून दिसले होते. ते म्हणाले होते की, ‘इंडियन आयडल’च्या निर्मात्यांनी त्यांना त्यांच्या प्रतिक्रियेऐवजी स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले होते. ज्यानंतर या शोवर बरीच टीका करण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा