काही दिवसांपूर्वी कन्नड सिनेजगतातील एका तरुण अभिनेत्रीच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता. सर्जरी दरम्यान चेतना राज या प्रतिभावान अभिनेत्रीचा मृत्यू झाला. कन्नड टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजची (२६ जून ) हा जन्मदिवस . तिचा जन्म कर्नाटकातील बंगलोर येथे 2001 मध्ये झाला. अल्पावधीतच तिने छोट्या पडद्यावर मोठे स्थान मिळवले होते. चेतना प्रादेशिक प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होती. तिच्या अभिनय कारकिर्दीत ती अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. चेतना ही त्या उगवत्या अभिनेत्रींपैकी एक होती जिने मनोरंजन विश्वात मोठे नाव कमावले, पण १७ मे २०२२ रोजी वयाच्या २१ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला.
चेतनाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे, मात्र ‘दोरेसानी’ आणि ‘गीता’मुळे ती घरोघरी प्रसिद्ध झाली. तिने अगदी लहान वयात इतकी लोकप्रियता मिळवली होती, ज्याचे स्वप्न प्रत्येक अभिनेत्री पाहत असते. या दोन्ही मालिका कलर्स कन्नडवर प्रसारित झाल्या. याशिवाय तिने ओल्विना निलडाना सारख्या मालिकांमध्येही काम केले आहे. छोट्या पडद्याव्यतिरिक्त तिने हवाई नावाचा चित्रपटही केला आहे जो अद्याप प्रदर्शित झालेला नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेतनाने प्लास्टिक सर्जरीसाठी बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संध्याकाळपर्यंत अभिनेत्रीची तब्येत ढासळू लागली. फुफ्फुसात पाणी भरल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने चेतनाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या आई-वडिलांकडे शस्त्रक्रियेसाठी परवानगीही मागितली होती, परंतु चेतनाचे हे ऐकून कुटुंबीयांनी शस्त्रक्रियेला नकार दिला. यानंतर ती तिच्या मैत्रिणींसोबत स्वतःहून शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात गेली.
चेतनाच्या मृत्यूनंतर तिचे वडील वरद राजू यांनी रुग्णालयावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिचे वडील म्हणाले की, ‘माझ्या मुलीला सोमवारी सकाळी 8.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आम्हाला याची माहिती मिळेपर्यंत ऑपरेशन सुरू झाले होते. संध्याकाळपर्यंत फुफ्फुसात पाणी आणि चरबी भरल्याने चेतना यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आयसीयूमध्ये योग्य सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सध्या वडिलांच्या या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी रुग्णालयाविरोधात तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.
- हेही वाचा-
- इंस्टाग्रामवर लाईव्ह येत अभिनेता शाहरुख खानने केले चाहत्यांना खुश, ‘हे’ होते खास कारण
- ‘भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही..’ अभिनेते अमोल कोल्हेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, व्हिडिओ होतोय व्हायरल
- अभय देओलने उघडली फिल्म इंडस्ट्रीची पोल म्हणाला, ‘इथे प्रमोशनसाठी खोट्या बातम्या पसरवल्या जातात’