कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड नुकसान होत आहे. सगळीकडे मृत्यूचे तांडव बघायला मिळत आहे. कोरोना झालेल्या लोकांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी भटकावे लागत आहे. स्मशानभूमीत मूतदेहांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. लोक कोरोनापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. बॉलिवूडचे धरम पाजी म्हणजेच धर्मेंद्र आणि ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी हे गेल्या एक वर्षापासून एकमेकांना भेटले नाहीत. चित्रपटाच्या कथेतील आयुष्यासारखे ते दोघे त्यांच्या खऱ्या जीवनात जगत आहेत. हे लोकप्रिय जोडपे गेल्या एका वर्षापासून कोरोनामुळे एकमेकांपासून लांब आहेत.
गेल्या वर्षी कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली होती, तेव्हा धर्मेंद्र त्यांच्या फार्महाऊसवर आले होते. त्यांनी अजूनही स्वतःला उर्वरित जगापासून दूर ठेवले आहे. हेमा मालिनी यांना याबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या की, ‘धर्मेंद्र यांच्या सुरक्षेसाठीही हे महत्त्वाचे आहे.’ यादरम्यान, सोशल मीडियाच्या मदतीने धर्मेंद्र आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहिले आहेत, आणि फार्म हाऊसमध्ये आपल्या कार्यांविषयी लोकांना सांगत आहेत.
हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सर्वात चांगली जागा आहे. आता एकत्र राहून वेळ घालवण्यापेक्षा आपण त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. गेल्या १०० वर्षात आपण पाहिलेल्या सर्वात भीषण परिस्थितीत जगत आहोत. आपण खरोखर एक समाज आहोत, तर आपण खूप खंबीर असलो पाहिजे. त्यासाठी आपल्याला बलिदान द्यावे लागले तरीही चालेल.’
कोरोनामुळे ‘अपने २’ चित्रपटाचे शूटिंगही पुढे ढकलण्यात आले आहे. सुपरहिट चित्रपटात काम करण्यासाठी सगळेच प्रचंड उत्सुक होते, पण त्यानंतर कोरोनामुळे या चित्रपटांचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. माध्यमांशी संवाद साधताना, अनिल शर्मा म्हणाले की, त्यांनी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले नाहीये. ते म्हणाले की, धर्मेंद्र यांच्या आरोग्यापेक्षा या चित्रपटाचे शूटिंग महत्त्वाचे नाही.
कोरोनाच्या काळात आपण आनंदी कसे राहू शकतो, याकरता धर्मेंद्र यांनी वासराचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्याला सगळ्यांनी खूप पसंती दिली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोरोनाच्या समोर सोनू सूदही झाला असहाय्य! ट्वीट करत म्हणाला, ‘दिल्लीमध्ये देव शोधणे सोपे, पण…’
-‘मी शांत बसणार नाही…’, आमिर खानसोबत काम केलेल्या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, भाजपवर मोठा आरोप