Friday, July 5, 2024

ऐश्वर्या रायच्या ‘या’ अटींमुळे झाला तिचा सलमान खानसोबत ब्रेकअप? कुटुंबाबाबतही बोलली ‘असे’ काही

सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या अफेअरपासून ते ब्रेकअपपर्यंतच्या चर्चेने एकेकाळी बऱ्याच चर्चा रंगवल्या होत्या. माध्यमातील वृत्तानुसार, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यात जवळीक वाढली होती. त्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे अफेअर ज्या वेगाने पुढे गेले होते, त्याच वेगाने त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे ब्रेकअप का झाले? याबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत असतात. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत, आज आम्ही तुम्हाला अशाच एका कारणाबद्दल सांगणार आहोत. बातमीनुसार, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपमागे अनेक कारणे होती. त्यापैकी एक म्हणजे ऐश्वर्या रायच्या काही अटी, ज्यामुळे त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता. (did aishwarya rai put this condition before salman khan for keeping relationship with him)

सलमान खान आजही मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या रायची एक अट होती की, लग्नानंतर सलमान खान त्याच्या कुटुंबासोबत राहणार नाही. सलमान खानने हे मान्य केले नाही आणि यावरून त्याच्या आणि ऐश्वर्यामध्ये तणाव निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, ऐश्वर्या रायची दुसरी अट होती की, सलमान खान त्याचे भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) आणि सोहेल खान (Sohail Khan) यांच्या कोणत्याही प्रोजेक्ट आणि चित्रपटात पैसे गुंतवणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याच्या या दोन्ही अटी सलमान खानला मान्य नव्हत्या आणि त्यामुळे त्यांच्यातील तणाव वाढतच गेला, ज्यामुळे २००२ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.

हेही वाचा :

हे देखील वाचा