Wednesday, July 3, 2024

मालदीव सरकाराने भारतीय पर्यटकांवर घातली बंदी, दिशा पटानीसह मुंबई विमानतळावर परतताना दिसला ‘हा’ अभिनेता

कोरोनामुळे महाराष्ट्रात १५ दिवसांचा कडक लॉकडाउन घोषित झाला आहे. यातच चित्रपटांचे चित्रीकरण बंद झाले आहेत. घरी बसून काय करायचा म्हणून काही कलाकारांनी नुकतीच मालदीवला भेट दिली आहे .मालदीव द्वीपसमूह  हा जगातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. मालदीवचा अर्धा  भाग हा पाण्याने व्यापला आहे. अतिशय सुंदर मालदीव हे जगातील अतिशय सुंदर बेटांपैकी एक बेत आहे. ही अशी जागा आहे की, अनेक कुटुंब, हनीमून जोडीपासून ते ग्रुप ट्रिपला ही जागा अजिबात निराश करत नाही. अनेक कलाकारांचे फिरायचे ठिकाण म्हणून पहिली पसंती मालदीवला दिली आहे. परंतू आता २७  एप्रिलपासून मालदिव सरकाराने भारतीय पर्यटकांवर बंदी घातली आहे. यामुळे कलाकार भारतात परतत आहेत.

बॉलिवूड अभिनेता टायगर  श्रॉफ आणि दिशा पटणी मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद घेऊन नुकतेच मायानगरी मुंबईत परत आले आहेत. या जोडप्याला नुकतेच विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे. त्यांचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे . काही दिवसर्पपूर्वी ही जोडी सुट्टीला म्हणून मालदीवला गेली होती. या दरम्यान दिशाने आपले अनेक आकर्षक स्टनिंग बिकनी फोटो इंन्टाग्रामवर शेयर केले होते. तिच्या फोटोला चाहत्यांनी खूप पसंत केले होते.

काही लोकांनी अनेक कलाकारांना कोरोनाच्या काळात मालदीवला जाऊन मज्जा केल्यामुळे ट्रोल केले होते. तसेच ते देशात भयानक परिस्थिती असताना देश सोडून जात असल्याचेही चाहते बोलत होते. परंतू मालदिव सरकाराने २७ एप्रिलपासून भारतीयांना मालदिवचा व्हिजा बंद केला आहे. याचमुळे हे कलाकार परत आल्याचे बोलले जात आहे. शनिवारी आलिया भट व रणबीर कपूरही मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. तसेच सारा अली खान व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरही मालदीवमध्ये दिसल्या होत्या. त्यांनीही काही फिटनेसचे व्हिडीओ शेअर केले होते.

या व्हिडिओतुन एक गोष्ट लक्षात येते की, टायगर आणि दिशा या दोघांनीही विमानतळावर सुरक्षित अंतर राखलेले दिसत होते. दिशा आणि टायगर यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा करत नाही परंतु ,हे दोघेही कायमच एकत्र स्पॉट होत असतात .यांच्या नात्याबद्दल एकदा टायगरला विचारण्यात आले होते तेव्हा, टायगरने दिशाशी प्रेम संबंध नसल्याचे सांगितले होते, परंतु त्याचे चाहते ही गोष्ट मान्य करत नाहीत. त्यामुळे जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र येते तेव्हा, त्यांच्या नात्याची फार चर्चा होत असते.

 

हे देखील वाचा