Wednesday, July 3, 2024

अरमान कोहलीच्या जामीन अर्जावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी, २ महिन्यांपासून आहे तुरुंगात

अं’मली पदार्थाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यनला न्यायालयाने शुक्रवारी (०८ ऑक्टोबर) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याला शुक्रवारी आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आले आहे. अं’मली पदार्थ प्रकरणात एनसीबीने गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांना अटक केली आहे. ‘बिग बॉस’ फेम अरमान कोहलीलाही एनसीबीने काही आठवड्यांपूर्वी अटक केली होती. अरमानच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. त्यावेळी काही प्रमाणात अं’मली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली होती.

अरमान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने मुंबई न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली. मिळालेल्या माहतीनुसार, त्याने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला आहे आणि या याचिकेवर १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. अरमान गेल्या दोन महिन्यांपासून आर्थर रोड कारागृहामध्ये आहे. एनसीबीने त्याला ऑगस्टमध्ये अं’मली पदार्थ जवळ बाळगणे आणि सेवन केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

अरमानवर आहेत अनेक आरोप
एनसीबीचे म्हणणे आहे की, अरमानवर अनेक गंभीर आरोप आहेत, ज्यात अं’मली पदार्थ सेवनासोबत अनेक आरोप करण्यात आले आहेत. अं’मली पदार्थाबाबतीत एनसीबीने अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत आणि सध्या शहरातून अं’मली पदार्थ बाहेर काढण्यात गुंतली आहे.

छाप्यात सापडलेली अं’मली पदार्थ
अरमानला अटक करण्यापूर्वी एनसीबीने त्याच्या घरावर छापा टाकला होता, जिथे काही प्रमाणात अं’मली पदार्थ सापडले होते. याबाबत अरमानला प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्याने त्याचे योग्य उत्तर दिले नाही. यानंतर एनसीबी अरमानला चौकशीसाठी आपल्या ऑफिसवर घेऊन गेली, जिथे त्याला अटक करण्यात आली होती.

अरमान कोहलीच्या आधी टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला अटक करण्यात आली होती. आता अं’मली पदार्थ प्रकरणात गौरवला जामीन मिळाला आहे. त्याला ५० हजार रुपयांवर मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याचवेळी त्याला न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहराबाहेर जाता येणार नाही असे निर्देश देण्यात आले आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अरमान कोहली शेवटचा सलमान खानसोबत ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात दिसला होता. याशिवाय त्याने ‘जानी दुश्मन’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस या रियॅलिटी शोचाही भाग राहिला आहे, जिथे तो तनिषा मुखर्जीसोबतच्या जवळकीमुळे प्रसिद्धीझोतात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर एनसीबीची धाड; अं’मली पदार्थ पुरवल्याचा आहे आरोप

-आर्यन खानच्या प्रकरणावर अभिनेत्री तापसी पन्नूची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाली, ‘स्टार फॅमिली असेल तर…’

-मुलाला जामीन न मिळाल्याने नाराज झाली गौरी खान, कारमध्ये रडतानाचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा