नुकतंच मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार नासिर फराज यांचे हृदय विकाराच्या आजाराने निधन झालं आहे. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक गाजणारे गाणे लिहिले आहेत. त्यांनी 2010 साली प्रदर्शित झालेला ‘काइट्स‘ चित्रपटामधील ‘दिल क्यों मेरा शोर करे’ आणि ‘जिंदगी दो पल की‘ सारखे गाजणारे गाणे लिहिले होते. त्याशिवाय नासिर यांनी ‘बाजीराव मस्तानी‘, कृष आणि काबिल चित्रपटासाठी देखिल गाणी लिहिले आहेत. त्यांच्या निधनामुळे गायन क्षेत्रामध्ये शोककळेचे वातावरण पसरले आहेत.
नासिर फराज यांचे मित्र आणि सिंगर मुज्तबा अजीज नाजा यांनीच नासिर यांच्या निधनाची बातमी दिली आहे. अजीज नाजानी मीडिया संस्थानांशी बोलत असताना सांगितले की, “नासिर अनेक दिवसांपासून हृदय विकाराच्या आजाराशी लढत आहे. सता वर्षापूर्वी त्यांची सर्जरी देखिल झाली होती. रविवार संध्याकाळी त्यांच्या हृदयात त्रास होऊ लागला आणि संध्याकाळच्या 6 वाजता त्यांचे निधन झाले. मुंबईच्या नालासुपारा कब्रिस्तानात त्यांना दफन केलं आहे.”
मुज्तबा अजीजने सोशल मीडियावर अकाउंटवरुन फराज यांचे काही फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सांगायचे झाले तर फराज हे इंडस्ट्रीमधील प्रतिष्ठित गीतकार म्हणून त्यांना ओळखले जायचे त्यांनी अनेक गाजणाऱ्या चित्रपटांसाठी गाणी लिहिले आहेत. 2013 साली प्रदर्शित झालेले चित्रपट ‘एक बुरा आदमी’, ‘तुम मुझे बस यूं ही’, ‘मैं हूं वो आसमान’, ‘कोई तुमसा नहीं’, ‘काबिल हूं’, आणि ‘चोरी चोरी चुपके’ सारखे अनेक गाणे लिहिले आहेत जे आजही ऐकल्यानंतर चाहत्यांच्या मनामध्ये घर करुन जातात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॅन्सरनंतर ‘या’ अभिनेत्रीला झाला त्वचा विकार, पोस्ट शेअर करत म्हणाली ‘माझ्या चेहऱ्यावर बरेच…’
ब्रेकिंग! बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकाराचे हृदय विकाराच्या आजाराने निधन,
ही बातमी सतत अपडेट होत आहे.