सिनेमाचे नाव काय असावे? हा नेहमीच आघाडीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असतो. सिनेमाचे नाव जितके चांगले, तितकेच त्याच्या प्रसिद्धीची शक्यताही जास्त असते. बॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे बनले आहेत, ज्यांच्या नावावरून वादविवाद झाले होते.
त्याचसोबत असेही काही सिनेमे बनले आहेत, ज्यांची नावे खाद्यपदार्थांसारखी आहेत. ती ऐकून प्रत्येकाला हसूही येईल आणि तोंडालाही पाणी सुटेल. चला तर मग आपण जाणून घेऊया त्या सिनेमांबाबत…
बर्फी (२०१२)
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत असलेला ‘बर्फी’ हा सिनेमा सन २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले होते. या सिनेमाचे नाव ऐकून तुम्हालाही तुमच्या आवडत्या मिठाईची आठवण येईल.
खिचडी (२०१०)
अनेकांच्या घरामध्ये बनवला जाणारा पदार्थ खिचडी ही खाण्यासाठी चागंली समजली जाते. परंतु लहानपासून मोठ्या पडद्यावर आलेला ‘खिचडी’ हा सिनेमा प्रत्येकाला हसायला भाग पाडणारा आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आतिश कपाडिया यांनी केले होते. या सिनेमात जमनादास मजेठिया, राजीव मेहता यांसारख्या कलाकारांचा समावेश होता.
चॉकलेट (२००५)
‘चॉकलेट’ हे नाव ऐकताच तुमच्या तोंडात नक्कीच पाणी येत असेल. परंतु या नावाचाही सिनेमा बनला आहे. २००५ साली विवेक अग्निहोत्री यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमात अनिल कपूर, सुनील शेट्टी, इरफान खान, अर्शद वारसी आणि तनुश्री दत्ता यांसारख्या कलाकारांचा समावेश होता.
आलू चाट (२००९)
आलू चाट आणि पापड हे पदार्थ सर्वांच्या आवडीचे समजले जातात. ‘आलू चाट’ या नावाचा सिनेमाही तयार झाला आहे. या सिनेमात आफताब शिवदासानी आणि कुलभूषण खरबंदा मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा २००९ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल यांनी केले होते.
पिझ्झा (२०१४)
पिझ्झा हे नाव ऐकताच सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत असेल, नाही का. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या नावाचाही सिनेमा तयार झाला आहे. त्यामुळे तुम्ही हा सिनेमा पिझ्झा खात खात पाहू शकता. हा सिनेमा २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन अक्षय अक्किनेनी यांनी केले होते.
अंगूर (१९८२)
मराठीत अंगूर म्हणजे द्राक्षे. अंगूर हे नेहमीच आंबट नसतात, काही गोडही असतात. ‘अंगूर’ या नावाचा सिनेमा १९८२ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा हास्य चित्रपट होता, याचे दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट निर्माता गुलजार यांनी केले होते. या सिनेमात संजीव कुमार यांंनी डबल रोल केला होता.
लव- शव ते चिकन खुराना (२०१२)
‘लव- शव ते चिकन खुराना’ चिकनपासून बनलेल्या विविध प्रकारच्या पदार्थांवर आधारित हा सिनेमा आहे. आता चिकनचे नाव आलंय म्हणल्यावर तोंडाला पाणी सुटणारच ना. हा सिनेमा २०१२ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन समीर शर्मा यांनी केले होते. या सिनेमात कुणाल कपूर, हुमा कुरेशी आणि राजेश शर्मा यांसारख्या कलाकारांचा समावेश होता.
कॉकटेल (२०१२)
कॉकटेल म्हणजे एकप्रकारे अनेक गोष्टींचे मिश्रण. सन २०१२ साली प्रदर्शित झालेला ‘कॉकेटल’ हा सिनेमा एक रोमँटिक कॉमेडी नाटक सिनेमा होता. या सिनेमाचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले होते. या चित्रपटात सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत होते.