बॉलिवूडमधील अनेक जोड्या प्रसिद्ध असतात. यातीलच एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी म्हणजे गौहर खान आणि झैद दरबार. त्या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. त्या दोघांनी मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्न करून एकमेकांना स्वीकारले आहे. त्यांचे अफेअर आणि लग्न या सगळ्या गोष्टी चाहत्यांसाठी एक सरप्राइज होते. गौहर आणि झैद हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या लग्नानंतर ६ महिन्यांनी त्यांच्या हनीमूनला गेले होते. तेथील सुंदर फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच गौहरने खुलासा केला आहे की, झैदने लग्नासाठी तिच्यासमोर एक अट ठेवली होती. ती अट पूर्ण झाली नाही तर त्याने लग्न कॅन्सल करण्याची धमकी दिली होती. (Gauahar khan reveals zaid darbar threatened her to cancel the marriage due to this reason)
गौहर खानने नुकतेच लग्नाला ७ महिने पूर्ण झाल्यानंतर झैद दरबारचे प्रेम, तिचे काम आणि लग्नाची तुलना केली आहे. ‘कॉफी टाईम विथ ग्रिहा’ या शो दरम्यान तिने तिच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे. तिने सांगितले की, “झैदने मला सांगितले होते की, मी तुझ्यासाठी तुझ्या कामाचे वेळापत्रक सगळं मॅनेज करेल. पण जर तू लग्नात मेहेंदी नाही काढली तर मी लग्न तोडेल.”
तिने सांगितले की, “मला मेहेंदी काढायची नव्हती कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मला ‘१४ फेरे’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईला जायचे होते.” एका मुलाखतीत गौहरने सांगितले की, त्यावेळी झैदने तिला पूर्ण सपोर्ट केला होता. तिने याबाबत सांगितले की, “झैद खूप सपोर्टीव्ह आहे. तो माझ्यासोबत त्यावेळी शूटिंगला देखील आला होता. कारण त्यावेळी आमचे नुकतेच लग्न झाले होते आणि मी नवीन नवरी होते.”
गौहरने पुढे या चित्रपटाच्या शूटिंगचा तिचा अनुभव शेअर करताना सांगितले की, “१४ फेरे मध्ये तुम्ही माझ्या हातावर जी मेहेंदी पहिली आहे ती माझ्या खऱ्या लग्नातील आहे. माहित नाही देवाच्या मनात नक्की काय होते. पण लग्नानंतर मला जेव्हा शूटिंगवर जायचे होते, तेव्हा माझ्या लग्नाचे सीन शूट होणार होते. त्यामुळे मला जास्त काही वाटले नाही.”
लग्नाच्या ६ महिन्यानंतर गौहर आणि झैद मॉस्कोमध्ये हनीमूनला गेले होते. लग्नाच्या काही दिवसानंतरच गौहर ‘तांडव’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल
-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख