Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड आपल्या काव्य वाचनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या हरिवंशराय बच्चन यांनी कवींना मिळवून दिला होता त्यांचा हक्क

आपल्या काव्य वाचनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या हरिवंशराय बच्चन यांनी कवींना मिळवून दिला होता त्यांचा हक्क

हिंदीमधील सर्वात मोठे दिग्गज कवी म्हणून हरिवंशराय बच्चन हे ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या कवितांनी आणि लिखाणाने सर्वांच्याच मनात आजही घर केले आहे. आजही हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचे लाखो चाहते आहेत. आजच्याच १८ जानेवारी २००३ रोजी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कवितांमध्ये सहजता आणि संवेदनशीलता यांचे योग्य मिश्रण असायचे. हरिवंशराय बच्चन यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ इलाहाबाद जवळच्या प्रतापगढ जिल्ह्यातील एका छोट्या पट्टी या गावात झाला. त्यांनी १९३८ साली इलाहाबाद विश्वविद्यालयात इंग्रजी साहित्यात एम ए केले आणि १९४१ ते १९५२ पर्यंत इलाहाबाद विश्वविद्यालयात त्यांनी प्रवक्ता म्हणून काम देखील केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी कॅंब्रिज विश्वविद्यालयात इंग्रजी साहित्यावर शोध घेतला.

जवळपास सात दशकांपूर्वी जेव्हा हरिवंशराय बच्चन स्टेजवर कविता ऐकवायचे तेव्हा प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन त्या ऐकायचे. १९५४ साली प्रयागराजमध्ये आयोजित एका कवी संमेलनामध्ये मानधन न घेता त्यांनी कविता सादर करायला त्यांनी नकार दिला. ते त्यांच्या अटीवर असून बसले शेवटी जवळपास एक तासानंतर आयोजकांनी त्यांना मानधन देण्याचे काबुल केले आणि हरिवंशराय बच्चन यांनी कविता सादर केली. तेव्हा त्यांना त्या कार्यक्रमासाठी १०१ रुपये मिळाले होते. त्यांनी स्वतः मानधन घेतले सोबतच त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर कवींना देखील मिळवून दिले. इथूनच कवींना मानधन देण्याची सुरुवात झाली जी आजतागायत चालू आहे.

प्रयागराज येथील जानेसेनजंग इथे जीरा रोडला जाणाऱ्या रस्त्यावर १९५४ साली कवी संमेलन आयोजित केले गेले होते. यात डॉ हरिवंश राय बच्चन, गोपीकृष्ण गोपेश, उमाकांत मालवीय आदी अनेक दिग्गज कवींनी सहभाग घेतला होता. तोपर्यंत हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला, मधुकलश, मधुबाला आदी कविता संग्रहणी धूम केली होती. म्हणून आयोजकांनी त्यांनाच आधी कविता म्हणण्यास सांगितले, मात्र एकावेळी बच्चन साहेबानी कविता सादर करण्यास नकार दिला. त्यांनी आयोजकांना सांगितले, “तुम्ही तब्बू वाल्याना, माईक वाल्याना पैसे देतात मग कवींना का नाही? त्यांच्यामुळेच ही मैफिल आहे ना?

हरिवंशराय बच्चन यांच्या कविता आज देखील अजरामर आहेत. अनेकदा अमिताभ बच्चन देखील त्यांच्या कविता विविध कार्यक्रमांमध्ये सादर करताना दिसतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?

कबीर बेदीने वयाच्या 70 व्या वर्षी 30 वर्षांनी लहान प्रेयसीसाेबत केले लग्न, वाचा संपूर्ण किस्सा

हे देखील वाचा