Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड पडद्यावर एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींमध्ये प्रत्यक्षात आहेत टोकाचे वाद

पडद्यावर एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींमध्ये प्रत्यक्षात आहेत टोकाचे वाद

हिंदी चित्रपटसृष्टी ही देशातील आघाडीची इंडस्ट्री म्हणून ओळखली जाते. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये सतत चढाओढ सुरू असते. या स्पर्धेमुळेच अनेकदा मोठमोठ्या अभिनेत्रींमध्ये टोकाचा वादसुद्धा निर्माण होतो. आज जाणून घेऊया अशाच काही प्रसिद्ध सिनेतारका ज्यांच्यामधील वाद आजही इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे.

पडद्यावर एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणाऱ्या कलाकारांमध्ये प्रत्यक्षातही तितकेच प्रेम असेल असे अजिबात नाही. या झगमगाटाच्या दुनियेत टिकून राहताना अनेकदा टोकाचे वाद होत असतात. या अभिनेत्री इंडस्ट्रीमधील वाढत्या स्पर्धेमुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यामुळेच इथल्या सिनेतारकांमध्ये मैत्री कमी आणि वादच जास्त पाहायला मिळतात. यापैकी अनेक आघाडीच्या अभिनेत्रींमधला वाद विकोपाला गेल्याची अनेक उदाहरणं आहेत. आजही या वादांची चित्रपट जगतात चर्चा होत असते. आज जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींबद्दल ज्यांच्यात टोकाचे वाद झाले आहेत.

करीना कपूर आणि बिपाशा बसू :
करीना कपूर आणि बिपाशा बसू दोघीही हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार २००१ मध्ये ‘अजनबी’ चित्रपटात दोघींनी एकत्र काम केले होते. यावेळी त्यांच्यात मोठा वाद झाला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना कपूरची डिझायनर तिला कसलीही कल्पना न देता तिची सहअभिनेत्री असलेल्या बिपाशा बसूची मदत करण्यासाठी गेली, ज्यामुळे करीनाचा पारा चढला होता. या कारणावरून करीनाने मोठा गोंधळ घातला होता.

सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय :
सोनम आणि ऐश्वर्या हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. दोघीही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार दोघींमध्ये एका जाहिरातीवरून मोठा वाद झाला होता. त्यावेळी ऐश्वर्या एका सौंदर्य प्रसाधनाच्या ब्रँडसाठी जाहिरात करत होती, परंतु ही जाहिरात नंतर सोनम कपूरला दिली गेली. त्यामुळे ऐश्वर्या राय चांगलीच संतापली होती. असे म्हणतात की, त्यावेळी ऐश्वर्याचा पारा इतका चढला होता की, तिने सोनम कपूरसोबत कान्समध्ये रेड कार्पेटवर चालण्यास सुद्धा नकार दिला होता. यानंतर सोनम कपूरने सुद्धा अनेकदा ऐश्वर्याला ‘आंटी’ म्हणत डिवचले होते.

श्रीदेवी आणि जया प्रदा 
८० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. दोघींनीही आपल्या सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र दोघींमध्ये वाद इतका होता की एकमेकींशी त्या बोलत सुद्धा नव्हत्या. ‘मकसद’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जितेंद्र आणि राजेश खन्नांनी दोघींमध्ये संवाद व्हावा म्हणून त्यांना एका खोलीत दोघींना बंद करून ठेवले होते. तासाभराने जेव्हा दार उघडलं गेल तेव्हा संवाद तर दूरच पण दोघी दोन कोपर्‍यात तोंड फिरवून बसल्याचे दिसून आले होते.

करिश्मा कपूर आणि रवीना टंडन 
करिश्मा कपूर आणि रवीना टंडनने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने ९० चा काळ गाजवला होता. आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. या दोघींमध्ये ही जोरदार भांडण झाले होते. दोघींनी ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटात एकत्र काम केले होते. ज्यामध्ये दोघींमध्ये असलेले प्रेमळ नाते प्रेक्षकांना आवडले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ‘आतीश’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघींमध्ये मोठा वाद झाला होता. त्यामुळे त्या बोलत नव्हत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

हे देखील वाचा