Friday, July 5, 2024

काय सांगता! ऋता दुर्गुळेने सोडली ‘मन उडू उडू झालं’ मालिका, चाहत्यांमध्ये पसरली नाराजी

मराठी सिने जगतातील अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) विविध कारणांमुळे चांगलीच चर्चेत येत आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या ऋताची ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. या मालिकेतील ऋताच्या अभिनयाचे सर्वत्रच कौतुक होताना दिसत आहे. तसेच या मालिकेने ऋताला चांगलीच लोकप्रियताही मिळवून दिली आहे. मात्र ही चर्चेत असलेली मालिकाच ऋताने सोडल्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. काय आहे या मागचे सत्य चला जाणून घेऊ. 

छोट्या पडद्यावरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे. या मालिकेची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय, यामुळे घराघरात या मालिकला प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेतील सर्वात जास्त दिपा आणि इंद्राच्या जोडीने सर्वांचीच मने जिंकली आहेत. मालिकेत दिपाच्या भूमिकेत असलेल्या ऋताने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. मात्र आता ऋताच्या चाहत्याना मोठा धक्का बसला असून तिने ही मालिका सोडल्याची बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी ऋता आणि मालिकेचे निर्माते यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. सेटवर असलेल्या अस्वच्छतेमुळे ऋताने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. याच वादामुळे ऋताने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र करारानुसार तिला एका महिन्याचा नोटीस पिरीयड पूर्ण करावा लागणार आहे. मात्र ऋताने ही मालिका सोडल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कारण या मालिकेत ऋताच्या अभिनयाने सर्वांनाच मोहित केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा