Friday, July 5, 2024

काय सांगता! खरी आहे पवनदीप आणि अरुणिता यांची लव्हस्टोरी? आदित्य नारायणने सांगितले सत्य

‘इंडियन आयडल १२’ हा सिंगिंग रियॅलिटी शो कायमच चर्चेचा भाग असतो. काही दिवसांपासून पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल यांची प्रेमकथा सुरू आहे. प्रत्येक भागामध्ये दोघांबद्दल काहीतरी चर्चा केली जाते, किंवा ते दोघे सोबत गाणे सादर करतात. याशिवाय चॅनेलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या दोघांचे व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या नात्याची खूप चर्चा होती. आता शोचा होस्ट आदित्य नारायणला याबद्दल विचारले असता, त्याने संपूर्ण सत्य सांगितले आहे.

आदित्य म्हणाला, “दोघेही रिलेशनशिपमध्ये नाहीत. दोघांनीही कधी नकार दिला नाही, आणि हा एक चांगला विनोद आहे.” याशिवाय आदित्य म्हणाला म्हणाला, “प्रेक्षकांनी स्पर्धकांवर, त्यांच्या अभिनयावर आणि शोच्या सत्यतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आम्ही सर्व शोचे महत्त्वाचे पात्र आहोत. आपल्या आसपासच्या लोकांना, आम्ही कार्यक्रमाचे प्रदर्शन मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करतो.”

आदित्य पुढे म्हणाला की, “ही सर्व एक रणनीती आहे, कारण जर कार्यक्रम ९० मिनिटांचा असेल, तर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तुम्हाला हे सर्व करावेच लागेल. ज्याप्रकारे पवनदीप आणि अरुणिता यांना चिडवतो, कोण जाणे त्या दोघांत काय होईल, आणि काही नाहीच झाले तरीसुद्धा, दोघे पुढे जातील. आत्ता ते आनंद घेत आहेत.”

आदित्यने आपल्या आणि नेहा कक्कर यांच्या लिंक अपच्या वृत्ताचे उदाहरण दिले आहे. तो म्हणाला, “लोकांना वाईट वाटू लागले होते, कारण ते आपले नातेवाईक आहेत.” यानंतर आदित्यने दररोजच्या कामातील एक उदाहरण दिले. तो म्हणाला, “लोकांना माहित आहे की, कट म्हणल्यावर कलाकार त्यांच्या खऱ्या पार्टनरकडे जातात. मग रियॅलिटी शोबद्दल इतका गदारोळ का.”

आदित्यने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, त्याने अचानक गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न का केले होते. तो म्हणाला होता, “कोव्हिडने आमच्या लग्नाच्या प्रक्रियेस गती दिली होती. वास्तविक, शेवटच्या लॉकडाऊनमध्ये माझ्या, आणि श्वेतामध्ये बर्‍याच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल वादविवाद झाला, कारण मला तिची खूप आठवण यायची. श्वेताचे घर आता जिथे आम्ही राहतो त्यापासून अर्धा किलोमीटर दूर होते, परंतु तरीही आम्ही भेटू शकत नव्हतो. यामुळे मला खूप त्रास व्हायचा. आपण ज्यांच्यावर प्रेम करता, त्यांनी कायम तुमच्या सोबत राहावे अशी तुमची इच्छा असते. त्यामुळे मी ठरवले की, लॉकडाऊननंतर आमच्यात आता कोणतेही वाद नको.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या सुखी संसाराला ३७ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर पडला शुभेच्छांचा पाऊस!

-‘तुमच्या सारख्या माणसांनी या दुनियेला खरंच सुंदर आणि शांतीपूर्ण बनवलंय’, सोनू सूदने केली सीएसकेच्या ‘या’ खेळाडूची प्रशंसा

-‘मास्क लावायचे ज्ञान देत होती, आता..’, हर्षाली मल्होत्राचे बीचवरील फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा