Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड पवनदीप राजनचा खुलासा; जीवघेण्या अपघातानंतर महिन्यांनी उघड केला थरारक अनुभव

पवनदीप राजनचा खुलासा; जीवघेण्या अपघातानंतर महिन्यांनी उघड केला थरारक अनुभव

इंडियन आयडल १२ चे विजेते आणि प्रसिद्ध गायक पवनदीप राजनचा (Pawandeep Rajan )यंदाच्या सुरुवातीला झालेला भीषण अपघात त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा वळण ठरला. आता, सुमारे ६-७ महिन्यांनंतर, पवनदीपने पहिल्यांदा त्या रात्रीचा अनुभव उघड करताना अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.

अलीकडेच सलीम–सुलेजमान यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या पवनदीपने सांगितले की, अपघातानंतर सुरुवातीला कोणीही मदतीला धावून आले नाही. तो म्हणाला,आमच्या कारला अपघात झाला तेव्हा लोक फक्त बघत होते. गाडी पेटली होती आणि मी तिच्या आत अडकलो होतो. काही वेळाने पोलिस आले आणि त्यांनी मला बाहेर काढलं. मी किती वेळ बेहोश होतो हे मला ठाऊक नाही. शुद्धीवर आलो तेव्हा मी गाडीतून बाहेर पडलो होतो. त्यानंतर मला रुग्णालयात नेण्यात आले.

अपघातात पवनदीपचे दोन्ही पाय आणि एक हात तुटला, तसेच डोक्यालाही दुखापत झाली. दिल्ली–एनसीआरमधील रुग्णालयात त्याच्यावर अनेक मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.पहिल्या महिन्यात मी एका बाजूला हलूही शकत नव्हतो. परंतु आता मी थोडं चालू शकतो, हे माझ्यासाठी मोठं समाधान आहे. या अनुभवाने मला चालण्याचं महत्व समजलं.

मुंबईला आलो तेव्हा जवळजवळ एक महिना मी हालचाल करू शकत नव्हतो. आता हळूहळू चालायला सुरुवात केली आहे आणि गिटार वाजवण्याचाही सराव करतोय. हातात ताकद येते आहे, पण अजूनही पूर्णपणे बरा होण्यासाठी वेळ लागणार आहे.”

हा अपघात ५ मे रोजी मुरादाबादजवळ झाला होता. दिल्लीहून अहमदाबादला शोसाठी जात असताना पहाटे ३ वाजता त्यांची कार एका उभ्या ट्रकला धडकली. सुरुवातीला त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर अत्याधुनिक उपचारांसाठी दिल्लीला हलवण्यात आले होते.आज, पवनदीप हळूहळू बरा होत असून आपल्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

8 वर्षांनंतरही शशी कपूर कायम स्मरणात; जाणून घ्या त्यांच्या कारकीर्दीचे खास टप्पे

हे देखील वाचा