Wednesday, July 3, 2024

कंगनाला ‘ते’ विधान भोवणार? जावेद अख्तर यांनी ठोकला मानहानीचा दावा ! कंगनावर आतापर्यंत चार गुन्हे दाखल

हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ गीतकार, शायर आणि लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्या विवादित विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाने एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांच्यावर तिला धमकावल्याचा आरोप केला होता. हा आरोप तिने मागील काही दिवसांमध्ये अनेकवेळा केला होता. याच आरोपाविरुद्ध जावेद अख्तर यांनी कंगनावर गुन्हा दाखल केला.

काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “एकदा जावेद अख्तर यांनी तिला त्यांच्या घरी बोलावून तिला धमकी देत ऋतिक रोशन आणि त्याच्या परिवाराची माफी माग असे सांगितले. ते पुढे असेही म्हणाले की, जर तू त्यांची माफी मागितली नाही तर तुला ते तुरुंगात टाकतील. तुझे जीवन अनेक संकटांनी भरून जाईल. तेव्हा तुला स्वतःला त्रास करून घेण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसेल. तू आत्महत्या करायचा विचार देखील करू शकते. हे सर्व बोलत असताना ते माझ्यावर ओरडत होते, आणि मी थरथर कापत होती.”

जावेद अख्तर यांनी अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन कोर्टात तक्रार दाखल केली असून, त्यानी त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून त्यांचा जबाब देखील नोंदवला आहे. अख्तर यांनी त्याच्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, कंगनाला भारतीय दंडसंहिताच्या मानहानीचा कलमांतर्गत योग्य ती शिक्षा व्हावी. कंगनाने माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत समाजातील माझ्या प्रतिष्ठेला ठेस पोहचवली आहे.”

सोबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जावेद अख्तर इतके दिवस या आरोपांकडे दुर्लक्ष करत होते, मात्र आता त्यांना कंगनाची आरोपांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कंगनाच नाही तर कंगनाची बहीण आणि मॅनेजर असलेल्या रांगोळी चंदेल हीने देखील जावेद अख्तर यांच्यावर कंगनाला धमकावण्याचा आरोप केले होते. कंगनावर आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत.

हे देखील वाचा