अभिनेत्रीतून राजकारणी बनलेली कंगना रणौत अनेकदा तिच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना रणौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच झालेल्या एका संभाषणात, अभिनेत्रीने खुलासा केला की लोक इतर अभिनेत्यांना फोन करायचे आणि ‘इमर्जन्सी’मध्ये तिच्यासोबत काम न करण्यास सांगायचे.
अलीकडेच कंगनाने हे खुलासे केले की कसे चित्रपटसृष्टीत तिच्या विरोधात षडयंत्र सुरू आहे आणि त्याचा परिणाम तिच्या चित्रपटाच्या निर्मितीवर झाला आहे. तिच्या अलीकडील एका मुलाखतीत कंगनाने आरोप केला की अनेक कास्टिंग डायरेक्टर, सिनेमॅटोग्राफर आणि अभिनेत्यांनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला.
या मुलाखतीत कंगनाने सांगितले की, तिच्या विरोधात बरेच षड्यंत्र रचले गेले होते, ज्यामध्ये काही लोक इतर कलाकारांना आगाऊ फोन करत होते आणि त्यांना तिच्यासोबत काम न करण्याच्या सूचना देत होते. ती म्हणाली, “अनेक कास्टिंग डायरेक्टर्स आणि डीओपींनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला. अभिनेत्यांना माझ्यासोबत काम न करण्याचे कॉल येत होते. माझ्याविरोधात खूप षडयंत्र रचले जात होते.”
त्यानंतर तीने स्वत:ला भाग्यवान मानले की इतक्या सर्व अडचणी असूनही, तिला अनुपम खेर, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक आणि महिमा चौधरी या अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ती म्हणाली की, जेव्हा लोक प्रतिकूल परिस्थितीत तुमच्यासोबत काम करण्यास तयार होतात तेव्हा ती जगातील सर्वोत्तम भावना असते. ती पुढे म्हणाली की, ‘इमर्जन्सी’ मधील कलाकारांनी केवळ तीच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शवली नाही तर तीच्याशी अत्यंत आदर आणि प्रेमाने वागले.
कंगना लवकरच तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कंगना व्यतिरिक्त चित्रपटात श्रेयस तळपदे, सतीश कौशिक, महिमा चौधरी मुख्य भूमिकेत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
शरीर तिचं आहे, निर्णय सुद्धा तिचाच आहे ! वडील होण्याच्या पार्श्वभूमीवर बोलला जस्टीन बिबर…