Friday, July 5, 2024

वयाच्या १४ वर्षीच पडली होती आमिर खानच्या प्रेमात, पहिल्या चित्रपटात किरणला मिळाले खरे प्रेम

बॉलिवूड अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आमिर खानची पत्नी किरण राव ही नेहमीच चर्चेत असते. तसे पाहायला गेले तर किरणने काही जास्त चित्रपटात काम केले नाही. परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अशातच  मंगळवारी (७ नोव्हेंबर) किरण तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी…

किरणचा जन्म ७ नोव्हेंबर १९७३ रोजी बंगळुरूमध्ये झाला आहे. ती चित्रपटासृष्टीत एक प्रोड्युसर म्हणून काम करते. तिने अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच तिने ‘लगान’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. २००५ मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी लग्न केले. आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. परंतु नुकतेच काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला. (kiran rao birthday special : she fell in love with aamir khan in childhood)

किरण लहान होती तेव्हापासूनच तिला आमिर खान खूप आवडत होता. त्यावेळी तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल की, पुढे जाऊन ती त्याच्या आयुष्याची जोडीदार होणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ती जेव्हा १४ वर्षाची होती, तेव्हाच ती आमिर खानवर खूप प्रेम करत होती. किरणने एका मुलाखतीत सांगितले होते की, आमिर खानचा ‘कयामत से कयामत’ हा चित्रपट बघितल्यानंतर ती त्याची खूप मोठी फॅन झाली होती.

किरणने जेव्हा ‘लगान’ या चित्रपटात आशुतोष गोवारीकरसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते, तेव्हा आमिर खानसोबत तिची खूप चांगली मैत्री झाली. हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली. आमिरला तिचा स्वभाव खूप आवडला होता. किरणने ‘लगान’ या चित्रपटातूनच तिच्या करिअरला सुरुवात केली आणि तिथेच तिला खरे प्रेम मिळाले.

एक दिग्दर्शक म्हणून किरणने ‘धोबीघाट’ चित्रपट केला आहे. हा चित्रपट २०११ मध्ये आमिर खानच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली प्रदर्शित झाला होता. आमिर आणि किरण यांना आजाद नावाचा एक मुलगा आहे. किरण राव पाणी फाउंडेशनच्या एक एनजीओची को-फाउंडर आहे. ते महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील पाण्याच्या समस्या सोडवतात.

किरण आणि आमिर यांच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांना खूप दुःख झाले होते. सगळेजण या रोमँटिक जोडप्याने असा निर्णय का घेतला असा विचार करत होते. परंतु त्यांनी आमच्यात सगळं काही ठीक आहे असे सांगितले होते. तसेच पाणी फाउंडेशनमध्ये देखील ते एकत्र काम करणार आहेत आणि त्यांच्या मुलाचा देखील एकत्र सांभाळ करणार आहेत.

हेही नक्की वाचा-
जेव्हा प्रीताला एकटीला पाहून ऋत्विक धनजानीने केले होते प्रपोज, उत्तर ऐकून स्तब्ध झाला होता अभिनेता
तब्बल सात वर्षानंतर का तुटले ऋत्विक आणि आशाचे नाते? ऋत्विकच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया कारण

हे देखील वाचा