Friday, July 5, 2024

धुक्याने भरलेल्या रात्री जेव्हा गाणं गायची ‘ती’, थरथर कापायचे गावकरी! २० वर्षांनी उलगडलं ‘हे’ रहस्य

धुक्याने भरलेली गडद रात्र. सगळीकडे भयाण शांतता पसरली. त्या शांततेला चिरत येतो एक हृदयस्पर्शी आवाज. पण हा आवाज जितका गोड होता, तितकीच त्याची भीती जास्त होती. जसे ही गूढ मुलगी अंधाऱ्या रात्री आपले गाणे सुरू करते, तसे गावकरी भीतीने थरथर कापत आपल्या घरात लपतात. नक्कीच तुम्हाला हे संपूर्ण सी खूपच भितीदायक वाटत असेल. पण हे खरे आहे, कारण हे रिअल नाही तर रील लाईफमध्ये घडले आहे. होय, आम्ही हॉरर-मिस्ट्री चित्रपट ‘२० साल बाद’ चित्रपटाबद्दल. हा चित्रपट १९६२ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

‘२० साल बाद’ची कहाणी
ही कहाणी एका गावाची आहे. या गावचा ठाकूर गावात असे काही करतो, की एक मुलगी आत्महत्या करते. मग त्या ठाकूरचाही मृत्यू होतो. लोकांचा असा विश्वास आहे की, मुलीने बदला घेतला आहे. त्यानंतर ठाकूरच्या कुटुंबातील इतर सदस्यांचाही मृत्यू होतो. पण एके दिवशी ठाकूरचा नातू अभिनेता विश्वजीत येतो. मग त्यालाही एका मुलीचा आवाज ऐकू येतो आणि तो अस्वस्थ होतो. हा रहस्यमय चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवेल आणि त्यातील गाण्यांची जादूही अप्रतिम आहे. (know the truth of mysterious girl who sing song in dark night villagers scared from her bees saal baad)

‘२० साल बाद’चे कलाकार आणि दिग्दर्शक
विश्वजीत आणि वहिदा रहमान यांचा हा चित्रपट जवळपास साठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. पण जेव्हा चित्रहार किंवा दूरदर्शनवर त्याची गाणी यायची, तेव्हा गूढतेचे जग पसरायचे. पण आता हा चित्रपट ओटीटीवर आहे. याला इरॉसवर पाहिले जाऊ शकते. या चित्रपटाचे दिग्दर्शन बिरेन नाग यांनी केले होते. त्याचे संगीत हेमंत कुमार यांनी दिले होते. विशेष म्हणजे १९८६ मध्ये मिथुन चक्रवर्तीचा एक चित्रपटही याच नावाने बनला होता.

हे देखील वाचा