भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज 6 फेब्रुवारीला पहिली पुण्यतिथी आहे. गेल्या वर्षी आपल्या लाडक्या लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर देशातील सगळया दिग्गजांनी गर्दी केली होती. यापुर्वी शिवाजी पार्कवर असाच जनसमुदाय फक्त हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर झाला होता. आपल्या मृत्यूने संपुर्ण देशाला दुःख सागरात लोटणाऱ्या या दोन महान व्यक्तींचे नाते ही खूप खास होते. पाहूया लता मंगेशकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नात्यातील काही रंजक गोष्टी.
बाळासाहेब ठाकरे यांचे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांशी जवळचे संबंध होते. मात्र त्यांचे आणि लता मंगेशकर यांचे बहीण भावाचे नाते सर्वांनाच ठाऊक आहे. लता मंगेशकरांना बाळासाहेब आपली बहीण मानायचे, त्यांच्या कार्याचे कौतुक करताना बाळासाहेबांनी दीदींना “तू या देशाचा स्वाभिमान आहेस आणि महाराष्ट्र कन्या आहेस याचा मला सार्थ अभिमान आहे,” असे गौरवोद्गार काढले होते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्यांनी लता दीदींना सांगितली होती. लता दीदींनाही बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्व कौशल्याचे खूप कौतुक होते. लता दीदींच्या प्रत्येक संकटात बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. आपल्या अखेरच्या काळात बाळासाहेबांनी लता दीदींना मी आता जाणार आहे असे सुद्धा म्हटले होते.
एका मुलाखतीत बोलताना लता मंगेशकर यांनी याबद्दल खुलासा केला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणात जेव्हा त्या त्यांना भेटायला गेल्या तेव्हा बाळासाहेबांनी “माझे काम संपले, आता मी काही दिवसातच जगाचा निरोप घेणार असल्याचे,” बोलून दाखवले होते. यावेळी लता मंगेशकर सुद्धा भावूक झाल्या होत्या. दरम्यान आपल्या महान कार्याने या दोन्हीही व्यक्तिमत्वांनी संपूर्ण देशात नावलौकिक मिळवला होता. शिवाजी पार्कवर देशाने अनुभवलेला विशाल जनसमुदाय त्यांच्या आभाळाएवढ्या कर्तुत्वाचीच साक्ष देतो.(lata mangeshkar and balasaheb thackeray ्bonding)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
लता दीदी अन् मोहम्मद रफींमध्ये असे काय झाले होते की, तब्बल 4 वर्षे गायले नव्हते एकत्र गाणे
जेव्हा राज कपूर यांनी लता मंगेशकरांना म्हटलं होतं, ‘कुरूप’ मुलगी; मग ‘गानकोकिळे’नंही घेतला होता मोठा निर्णय