Monday, July 1, 2024

आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

 

लवकरच ‘बालिका वधू’ या शोचा नवीन सीझन येणार आहे. बालविवाहावर आधारित असलेल्या या शोच्या पहिल्या पर्वाला रसिकांनी दमदार प्रतिसाद दिला होता. या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आणि मनात आहे. यातील मुख्य अभिनेत्री असलेल्या प्रत्यूषाने आत्महत्या केली आणि तिच्या संपूर्ण परिवाराने तिच्यासोबत सर्व काही गमावले. सध्या तिचे आई वडील खूप मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. एका चॅनेलसोबत बोलताना तिचे वडील म्हणाले, “असे वाटते की मोठे वादळ आले आणि आमच्या मुलीसोबतच सर्व काही घेऊन गेले. प्रत्यूषाची केस लढत असताना आम्ही आमचे सर्वकाही गमावले आहे. आमच्याकडे आता एक रुपया देखील नाही.’ (Late Actress balikavadhu fem Pratyusha Banerjee Parents In Bad Financial Condition)

पुढे तिचे वडील शंकर बॅनर्जी म्हणाले “आमच्या मुलीने आम्हाला जमिनीवरून उचलून आकाशात नेऊन ठेवले होते. तीच आमचा आधार होती. मात्र ती गेली आणि आमचे सर्वकाही गेले. आता तर आमचे जीवनही खूप कठीण परिस्थितीतून जात आहे. आता तर आम्ही एका खोलीत राहत आहोत. अनेकदा कर्ज घेऊन बसलो आहोत.”

जीवन व्यतीत करण्यासाठी प्रत्यूषाची आई एका चाइल्ड केयर सेंटरमध्ये काम करते, तर वडील काही गोष्टी लिहितात. त्यातून त्यांना जे काही मिळते तेच वापरून ते जीवन जगतात. असे असूनही तिच्या वडिलांनी सांगितले की, पैसे कमी असले तरी त्यांनी हिंमत गमावली नाहीये. ते अजूनही प्रत्यूषाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहे. एक दिवस ते नक्कीच जिंकणार याचा त्यांना विश्वास आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?

-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप

-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी

हे देखील वाचा