Wednesday, July 3, 2024

‘मन उडू उडू झालं’ फेम अजिंक्य राऊतच्या गाडीला अपघात, व्हिडिओ शेअर करत सांगितला अपघाताचा थरारक अनुभव

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच ‘मन उडू उडू झालं’ नावाची मालिका सुरू झाली आहे. अगदी कमी काळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि त्यांच्या पसंतीची पोचपावतीही मिळवली. या मालिकेच्या कथानकासह या मालिकेतील मुख्य जोडी ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत अर्थात इंद्रा आणि दिपूची जोडी सुद्धा खूपच लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षक या जोडीवर भरभरून प्रेम करताना दिसत आहे.

मात्र या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य राऊतच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकताच अजिंक्यच्या गाडीचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघात कोणालाही दुखापत झाली नाहीये. अजिंक्यने स्वतः याबद्दल माहिती देणार एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या गाडीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ‘तुम्हाला मिळालेला प्रत्येक दिवस फार कृतज्ञतेने जगा’ असे कॅप्शन देत अजिंक्यने त्याच्या या व्हिडिओमध्ये सांगितले की, “आमच्या गाडीचा अपघात झाला त्यावेळी नशिबाने आमच्या गाडीचा वेग नियंत्रणात होता. म्हणूनच खूप भयंकर असे काही घडले नाही. शिवाय आजूबाजूला दरी नसलेला रस्ता असल्याने जीवघेणी दुर्घटना टळली. आमची गाडी जेव्हा स्किट झाली तेव्हा ती एका ११०० व्होल्टच्या खांबावर आदळणार होती. परंतु त्या खांबावर गाडी धडकू नये म्हणून मित्राने मोठ्या कष्टाने तिच्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर आमची गाडी या झुडपांमध्ये जाऊन धडकली. झाडीमुळे असल्यामुळे देवाच्या कृपेने आम्ही सर्वजण वाचलो. देवाचीच कृपा असल्यामुळे मला यंदाची दिवाळी बघता आली. घराच्यांसाठी घेतलेले गिफ्ट्स मी अपघातानंतर जमा करत होतो. हे सर्व झाल्यानंतर आयुष्य किती क्षणभंगूर असते हे समजले आहे.”

त्यानंतर तो व्हिडिओच्या पुढच्या भागात दुसऱ्या ठिकाणी दिसतो आणि म्हणतो, “नमस्कार मी अजिंक्य राऊत आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली. दरवर्षी दिवाळीला एखादा दिवस तरी मी परभणीला जातो. यंदा देखील मी ठाण्याहून परभणीला जात असताना रस्त्यात माझ्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी सुखरुप आहे.”

या अपघातातून तो काय शिकला हे सांगताना अजिंक्य म्हणाला, “या अपघातानंतर एक गोष्ट नक्की शिकलो ती म्हणजे अशी घटना जेव्हा घडते तेव्हा कोणतीही प्रसिद्धी, कोणताही पुरस्कार उपयोगाला येत नाही. ज्यावेळी एखादा जीवघेणा प्रसंग समोर येतो. त्यातून मला देवाने वाचवले. मी खरंच खूप भाग्यवान आहे. या उरलेल्या आयुष्यात मला काही तरी चांगलं करता येईल, अशी अपेक्षा आहे. स्वत:ची काळजी घ्या. कारण आता माझ्या लक्षात आले आहे की, एका सेकंदात सर्व काही संपू शकते. कोणताही चमत्कार होण्याची वाट पाहू नका. फक्त पुढे जा आणि तुमची स्वप्ने पूर्ण करा.” दरम्यान सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिवाळीचा ट्रॅक चालू असून, दिवाळीनिमित्ताने फटाके न फोडण्याचा आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संदेश या मालिकेतून दिला जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा