विद्येचे आणि सांस्कृतिक परंपरांचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाचा मुद्दा सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री विशाखा सुभेदारने या नाट्यमंदिरात होणाऱ्या गैरसोईचा पाढा वाचला होता. याबद्दलची तिची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. याच विषयावर आता पुन्हा एका अभिनेत्याने नाराजी व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या पोस्टमुळे हा मुद्दा पून्हा एकदा वर आला आहे.
प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. यावरुन ते विविध विषयांवर आपले अनुभव आणि पोस्ट शेअर करत असतात. सध्या त्यांची पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाबद्दलची पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट माध्यमांमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. या व्हायरल पोस्टमध्ये नाट्यगृह मंदिर बंद करण्यापेक्षा सुविधा सुधारल्या तर चांगले होईल अशी इच्छा व्यक्त केली आहे.
या पोस्टमध्ये मंगेशने “परवा परवा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे कार्यक्रम झाला, तेव्हा हा तुमचा शेवटचा कार्यक्रम आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. पहिल्यांदा कोणीतरी आपली गंमत करत आहे असंच मला वाटल. पण ही गोष्ट खरी आहे असं ऐकल्यापासून वाईट वाटतंय. पार्किंगमधील सर्व झाडेही तोडण्यात आली आहेत. खरंच याची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्यापेक्षा या सुविधा सुधारण्यांकडे आपण लक्ष दिले पाहीजे. आत्ता कुठे कोविड नंतर परिस्थिती सुरळित होत आहे. त्यामुळे हे नाट्यगृह बंद करण्यापेक्षा त्याच्या सुविधा सुधारण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे” असं मनापासून वाटतं. अशी मागणी केली आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- कान्स फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या तिच्या ड्रेसने लोकांना इंप्रेस करण्यात ठरली अपयशी, स्टायलिस्ट बदलण्याचा मिळाला सल्ला
- भारताने ऑस्करसाठी ‘हा’ चित्रपट पहिल्यांदा पाठवला होता, अवघ्या एका मताने हुकले होते विजेतेपद
- पहिल्या चित्रपटानंतरच कृष्णा अभिषेक झाला होता नैराश्याचा शिकार, कंटाळून पुन्हा एकदा वळला होता छोट्या पडद्याकडे