Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड शास्त्रीजींच्या सल्ल्यावरून मनोज कुमारांनी बनवला हिट चित्रपट, त्यातल्या ‘मेरे देश की धरती सोना उगले…’ गाण्याने तर गाजवला काळ

शास्त्रीजींच्या सल्ल्यावरून मनोज कुमारांनी बनवला हिट चित्रपट, त्यातल्या ‘मेरे देश की धरती सोना उगले…’ गाण्याने तर गाजवला काळ

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जात होते. मनोज कुमार यांनी ‘शहीद भगतसिंग’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘शोर’, ‘पूरब और पश्चिम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपली आंतरिक देशभक्ती दाखवली आहे. पण या सर्व चित्रपटांमध्ये ‘उपकार’ चित्रपट नेहमी अव्वल राहिला आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) च्या निमित्ताने, आम्ही तुम्हाला देशभक्तीने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाशी संबंधित काही मनोरंजक किस्से आज सांगणार आहोत.

मनोज कुमार यांनी एकदा आपल्या देशभक्तीच्या पात्रांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळी छाप सोडली होती. त्यांना इंडस्ट्रीने दुसरे नाव ‘भारत कुमार’ दिले होते. ‘उपकार’ हा चित्रपट मनोज कुमार यांनी नक्कीच बनवला होता, पण हे खूप कमी लोकांना माहिती आहे की, त्यांना या चित्रपटाची प्रेरणा कुठून मिळाली होती? खरं तर मनोज कुमार यांना हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली होती, जे त्यावेळीचे पंतप्रधान होते.

अनु कपूर यांनी त्यांच्या रेडिओ शो ‘सुहाना सफर’मध्ये याबद्दल सांगितले होते. अनु कपूर यांनी सांगितले होते की, “१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर मनोज कुमार एका चित्रपटाच्या संदर्भात पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजींना भेटायला गेले होते. शास्त्रीजी मनोज कुमार यांच्या देशभक्तीपर पात्रांमुळे खूप प्रभावित झाले होते. शास्त्रीजींनी मनोज कुमार यांना सांगितले की, त्यांनी देशाला दिलेल्या ‘जय जवान जय किसान’ या घोषवाक्यावर चित्रपट बनवावा, जेणेकरून लोकांना शेतकऱ्यांची देशभक्ती आणि मेहनतीची जाणीव होईल.

मनोज कुमार यांनी लाल बहादूर शास्त्री यांचा सल्ल्याचाही विचार केला. काही दिवसांनी त्यांनी ‘उपकार’ चित्रपटाची पटकथा तयार केली. त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने त्यांनी एक कथा लिहिली, ज्याद्वारे शेतकऱ्यांना देशभक्त म्हणून ओळखले जाईल. या चित्रपटाची कथा लिहिल्यानंतर यामध्ये कोण अभिनय करणार, हे देखील ठरले होते. यासाठी प्रेम चोप्रा, आशा पारेख आणि प्राण यांना फायनल करण्यात आले होते. विशेष गोष्ट म्हणजे, मनोज कुमार यांनी स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि चित्रपटात अभिनय देखील केला आहे.

याच दरम्यान राज कपूर यांनी मनोज कुमार यांना सल्ला दिला की, तुम्ही एकतर या चित्रपटाचे दिग्दर्शन करा किंवा त्यात अभिनय करा. कारण प्रत्येकजण राज कपूर असू शकत नाही. पण मनोज कुमार यांनी राज कपूर यांचे ऐकले नाही आणि दिग्दर्शनासोबतच अभिनय देखील केला. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर राज कपूर यांनी स्वतः सांगितले की, “आजपर्यंत मी स्वतःशी स्पर्धा करत होतो. मला आनंद आहे की, आज मला दुसऱ्यासोबत स्पर्धा करायला मिळाली.” त्याचबरोबर ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती’ या चित्रपटातील गाण्यानेही त्या काळात धुमाकूळ घातली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

-‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; वाचा त्यांचा रंजक प्रवास

-‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

हे देखील वाचा