Wednesday, July 3, 2024

‘…तिच्यासाठी खूप मोठी स्वप्न बघणारा…’ मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून मंडळी बापाची व्यथा

मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांना मोठे वेड लावले आहे. मालिकेत सतत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स सर्वांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहे. या मालिकेत असणाऱ्या प्रत्येक पत्राने स्वतःची एक येवगेळी इमेज प्रेक्षकांच्या मनात तयार केली आहे. अशातच मालिकेत ‘अनिरुद्ध’ ही भूमिका खूपच पराकोटीची नकारात्मक दाखवली आहे. या अनिरुद्धच्या लोकांना राग आल्याशिवाय राहत नाही.

आता सध्या या मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांची मुलगी असणाऱ्या ईशाच्या लग्नाचा ट्रॅक चालू आहे. ईशा खूप लहान असल्यामुळे तिच्या लग्नला अनिरुद्ध अर्थात तिच्या वडिलांचा नकार आहे. त्याच्या या नकारामुळे अनेक प्रेक्षकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मात्र आता एक वडील म्हणून अनिरुद्ध ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “एका बापाची व्यथा अनिरुद्ध च्या माध्यमातून मांडली जात आहे, अनिरुद्ध खूप चुकीचा वागतो आहे, एका चांगल्या कार्यात विघ्न आणतो आहे असं सगळ्यांनाच वाटणं साहजिक आहे.पण खरंच विचार केला तर अनिरुद्ध च म्हणणं अगदी बरोबर आहे, अनिरुद्ध म्हणतोय जोपर्यंत माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहत नाही , ती तिचं शिक्षण पूर्ण करत नाही , तिला आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते स्वप्न ती पूर्ण करत नाही , तोपर्यंत लग्नाच्या बेडीत तिला अडकवायचं नाही.

बाप म्हणून त्याला त्याची मुलगी खूप चांगली माहिती आहे, दोन वेळा ती प्रेमात फसली आहे, आता त्याचा तिच्या या प्रेमावर विश्वास नाही, त्याचं म्हणणं आहे की साखरपुडा झाल्यानंतर कशावरून यश आणि गौरी सारखा तिचाही साखरपुडा मोडणार नाही, त्याचं म्हणणं आहे की आधी शिक्षण पूर्ण करा, आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे रहा, आणि मगच हा लग्नाचा विचार करा, अनिरूद्ध असेही म्हणतो की , मुलगा पण अजूनही सेटल झालेला नाही , तोही अजूनही शिकतो आहे, मग एवढ घाई कशासाठी, अनिरुद्ध बाप म्हणून कुठेही चुकत नाही आहे कदाचित त्याची ही समजावण्याची पद्धत खूप चुकीची आहे.

पण ती अनिरुद्ध ची पद्धत आहे , तो वेगळा वागूच शकत नाही वेगळ्या पद्धतीने अनिरुद्ध समजावू शकत नाही. मुलीवर अतोनात प्रेम करणारा , तिच्यावर जीव लावणारा , तिच्यासाठी खूप मोठी स्वप्न बघणारा हा अनिरुद्ध आता पुढे काय करतोय, हे बघायला खूपच मजा येणार आहे. पुढचे सीन्स मी शूट केलेले आहेत, जे मला स्वतःला खूप भावले आहेत , पण ते मी तुम्हाला सांगू शकत नाही”.

मिलिंद यांनी अनिरुद्धने एका वडिलांच्या नजरेतून त्यांच्या मुलीला स्वावलंबी होऊन मगच लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचे देखील बरोबरच आहे. खऱ्या आयुष्यात देखील मुलींनी असेच करण्याचा सल्ला मिलिंद यांनी त्यांच्या या पोस्टमधून दिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘माझा संघर्ष घरात प्रसिद्ध चेहरे असल्यामुळे…’ ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिच्या कठीण काळाबद्दल

प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टवरून नेटकऱ्यांनी उडवली तिची खिल्ली विचारले, “हा कोणता खेळ आहे”

हे देखील वाचा