मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांच्या मनात पाळीव प्राण्यांविषयी नेहमीच एक आपुलकीची आणि मायेची भावना असल्याचे बऱ्याचदा आपल्याला दिसून येते. जवळपास सर्वच कलाकार कोणत्या ना कोणत्या पाळीव प्राण्याचे संगोपन करतात. त्यांना घरात आसरा देतात. मुके जीव असूनही त्यांच्यात देखील माया भरलेली असते. कलाकार त्याचे त्याच्या या खास ‘सोबतीं’ सोबतचे फोटो व्हिडिओ अनेकदा पोस्ट करताना दिसतात. त्यांच्याबद्दल भरभरून व्यक्त देखील होतात. आता अशाच काही भावना अभिनेते मिलिंद गवळी यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांच्याकडे असणाऱ्या एका कुत्र्याबद्दल लिहिले आहे.
View this post on Instagram
मिलिंद यांनी लिहिले, “Missing You “
“Dog is man’s best companion”
आणि हे आजचं नाही तर कालांतरा पासून कुत्रा हा माणसाच्या सगळ्यात जवळ असलेला प्राणी,
मला कुत्र्याची लहानपणापासून आवड होती, पण कुत्रा पाळायची जबाबदारी मात्र घ्यायची हिंमत कधी झाली नाही, मी लहान असताना कुत्र चावला की पोटामध्ये 14 इंजेक्शन घ्यावी लागायची. माझा मावस भाऊ प्रशांत हा एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला घरी राहायला आला होता, आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये डिक्की नावाचा कुत्रा त्याला चावला, रोज एक , असे 14 दिवस , त्याच्या बेंबीच्या आजूबाजूला पोटामध्ये डॉक्टर त्याला कुत्रा चावल्याचे इंजेक्शन द्यायचे, मीच जात होतो त्याच्याबरोबर दवाखान्यात, त्यामुळे कुत्रा हा चावतो आणि त्याची भीती मनामध्ये बसली होती.
पण नंतर वोडाफोनच्या जाहिरातीमध्ये तो पघ pug फार गोंडस आणि छान कुत्रा वाटायचा, तेव्हाच ठरवून टाकलं होतं की आपण पघpug हाच कूत्रा पाळायचा, माझी आई गेल्यानंतर घरचं वातावरण एकदम भकास झालं होतं, लेक मिथिला लहान होती.
मग तिच्या वाढदिवसाला दिल्लीवरून माझ्या मित्रांनी एक पघ पाठवला, मिथिला सोडली तर घरचे काही फार खुश झाले नव्हते, तसा कोणी विरोधी केला नाही, ते पिल्लू होतं, गोंडस आणि लागवी होतं,
त्याचं नाव मीच ठरवलं “हॅप्पी”,
आणि तसाच तो होता “हॅपी गो लक्की “
घरच्या सगळ्यांना त्यांनी जीव लावलाच पण अख्या बिल्डिंगच्या लहान मुलांचा लाडका झाला होता, संध्याकाळी सहा वाजता दररोज बिल्डिंग मधले दहा-बारा मुलं हॅपी बरोबर खेळायला यायची.
त्याला पण त्यांची सवय झाली होती,
म्हणता म्हणता बारा वर्षे कशी निघून गेली कळलच नाही, Happy कधी म्हातारा झाला कळलंच नाही,
पृथ्वीवर आम्हाला भेट देण्यासाठी ज्या ग्रहावरून आला होता. त्या परग्रहावर असंख्य गोड आठवणी मागे ठेवून तो निघून गेला, ज्या ज्या वेळेला एकटं वाटायला लागतं, lonely feel होतं, त्यावेळेला त्याची खुप आठवण येते,
निस्वार्थ प्रेम काय असतं ते या प्रेमळ प्राण्याकडनं शिकायला हवं, न कंटाळता न थकता जो प्रेम देईल त्याच्यावर दहापट प्रेमाची बरसात करत सुटायचं,
खास हॅपी ला भेटण्यासाठी आमच्याकडे खूप लोक यायची, आशालता बापगावकर त्यातल्या एक होत्या, त्या आणि हॅपी इतके खेळायचे की बघून आम्ही थक्क व्हायचो.
कोण कोणावर जास्त प्रेम करतो याची चढाओढ लागायची.
आज-काल असंख्य वेळेला मी छान छान कुत्र्यांना भेटत असतो, पण आता एखाद्याला घरी घेऊन येयची हिंमत होत नाही, कारण ते इतका जीव लावतात, की मग ते निघून गेल्यानंतर, त्यांच्या आठवणी फार त्रास देत असतात.”
मिलिंद यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांच्या त्यांच्या या पाळीव प्राण्यांबद्दलच्या आठवणी देखील शेअर केल्या आहेत. सोबतच मिलिंद यांची ही पोस्ट आवडल्याचे देखील सांगितले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! टीव्ही जगतातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला देहविक्रीचे रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक