आपल्याला नेहमीच कलाकारांची एक बाजू दिसत असते. कलाकारांचे आलिशान जीवन, सर्व सुखसोयींनी युक्त असे त्यांचे जीवन प्रत्येकालाच भूरळ पडणारे आहे. मात्र खरंच असे असते कलाकारांचे आयुष्य. नाण्याला नेहमीच दोन बाजू असतात, त्यामुळे जेवढे आनंदायी त्यांचे जीवन वाटत असले तरी तेवढे ते कधीच नसते. कलाकारांना देखील अनेक समस्या, अनेक संकटांचा सामना त्यांच्या खऱ्या आयुष्यात करावा लागतो. आता अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्याबद्दलच्या घ्या.
जुन्या काळातील अतिशय गाजलेल्या आणि सुपरस्टार असणाऱ्या मौसमी यांनी बॉलिवूडसोबतच बंगाली चित्रपटांमध्ये अतिशय उत्तम काम करत तुफान नाव कमावले. आपल्या निरागस चेहऱ्यामुळे आणि प्रतिभावं अभिनयामुळे मौसमी यांनी त्यांची एक वेगळी ओळख मनोरंजनविश्वात निर्माण केली. मौसमी यांचा जन्म कोलकात्यात झाला. तिथेच त्यांचे बालपण गेले आणि त्यानी शिक्षण घेतले. पुढे मौसमी यांनी चित्रपटामध्ये पदार्पण केले ‘अंगूर’, ‘अनुराग’, ‘दो प्रेमी’, ‘प्यासा’, ‘स्वयंवर’आदी उत्कृष्ट चित्रपटांमध्ये मौसमी यांनी काम केले.
त्यांच्या काळातल्या अतिशय मोठ्या सुपरस्टार असणाऱ्या सर्वच अभिनेत्यांसोबत त्यांची जोडी गाजली. अगदी राजेश खन्ना, शशि कपूर, जितेंद्र, संजीव कुमार, विनोद मेहरा आदी कलाकाराचा यात समावेश होता. मौसमी यांच्याबद्दल नेहमीच सांगितले जायचे की त्या इतक्या सुंदर आणि प्रभावी अभिनेत्री होत्या, की इमोशनल सीन्सला देखील त्यांना डोळ्यात पाणी आणण्यासाठी गिल्सरीनची गरज पडली नाही. त्या सीन करताना त्यात इतक्या एकरूप व्हायच्या की त्यांच्या डोळ्यात आपोआपच पाणी यायचे.
मौसमी यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे चित्रपटांमध्ये येण्याआधीच लग्न झाले होते. त्यांनी निर्माता असणाऱ्या जयंत मुखर्जी यांच्याशी लग्न केले. या लग्नानंतर त्यांना पायल आणि मेघ या दोन मुली झाल्या. सर्व काही नीट चालू असताना एका मोठ्या आजारात २०१९ साली मौसमी यांच्या मोठ्या मुलीचे पायलचे निधन झाले. मुलीच्या निधनामुळे मौसमी पूर्णपणे तुटल्या होत्या. मात्र तेव्हाच त्यांच्या साथीला पुन्हा चित्रपट आले आणि त्यांनी स्वतःला सावरले. मौसमी यांनी पिकू सिनेमातही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा