Friday, July 5, 2024

‘या’ कारणामुळे नीतू कपूरला येत होता ऋषी कपूर यांना सोडण्याचा विचार, स्वत: केला होता खुलासा

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आज या दुनियेत नाहीत. पण त्यांच्या आठवणी आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. त्यांचे चित्रपट असो किंवा नीतू कपूर आणि त्यांच्यातील नाते असो प्रेक्षकांना त्यांची प्रत्येक गोष्टी पसंत पडते. बॉलिवूडमध्ये नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडीला सगळ्यांनी खूप प्रेम दिले. ते दोघे आधी एकमेकांचे मित्र होते, नंतर त्यांनी लग्न केले. परंतु एक असा काळ आला होता जेव्हा नीतू कपूर यांच्या मनात ऋषी कपूर यांना सोडून देण्याचा विचार आला होता. या गोष्टीचा खुलासा स्वत: त्यांनी केला होता.

नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचं लग्न 22 जानेवारी 1980 साली झाले. मैत्री ते प्रेम आणि प्रेमा ते लग्न हा प्रवास त्यांनी पूर्ण केला. दोघांनीही 40 वर्षे एकमेकांसोबत संसार केला. प्रत्येक परिस्थितीत त्या दोघांनी एकमेकांची साथ दिली. ऋषी कपूर यांचा स्वभाव थोडासा कडक होता. तरीही नीतू कपूर यांनी त्यांना सांभाळून घेतले.

या गोष्टीचा खुलासा स्वतः नीतू कपूर यांनी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये केला होता. ते दोघेही कपिल शर्माच्या शोमध्ये गेस्ट म्हणून गेले होते, तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल बोलताना नीतू कपूर यांनी सांगितले की, “37 वर्षांपासून आम्ही सोबत आहोत, पण दिवसातून एक तरी क्षण असा येतो की, मी विचार करते बास आता मी चालले.”

https://twitter.com/Bollywoodirect/status/1255742670405644289

नीतू यांनी पुढे सांगितले की, “त्यानंतर मी त्यांच्यामधील चांगल्या गुणांना आठवते आणि निघून जायचा विचार सोडून देते.” त्यांनी ही गोष्ट सांगितल्यानंतर कपिल शर्मा आणि ऋषी कपूर देखील हसायला लागले. प्रेक्षकांना देखील नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्यातील हा आंबटगोड संवाद खूप आवडला.

दिनांक 30 एप्रिल, 2020 रोजी ऋषी कपूर यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या आजाराची माहिती मिळाल्यावर नीतू कपूर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर नीतू यांना खूप दुःख झाले होते. पण आता त्या या दुःखातून सावरून सामान्य आयुष्य जगत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

-‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री पडली होती टीव्हीवर भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात, १६ व्या वर्षी निभावले होते सूनेचे पात्र

-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित

हे देखील वाचा