बॉलीवडूच्या काही दिग्गज निर्मात्यांनी व संघटनांनी काही न्यूज चॅनेलवर भारतीय चित्रपट उद्योगावर अपमानजनक रिपोर्टिंग केल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिक टीव्ही व टाईम्स नाऊविरुद्ध त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. भारतीय चित्रपट उद्योग जगतावर अपमानजनक व गैरजबाबदार वार्तांकन केल्याचा आरोप ठेवत त्यांचे प्रसारण रोखण्याची मागणी केली. तसेच या मीडिया हाऊसने चित्रपट सृष्टीविरुद्ध मीडिया ट्रायल केल्याचाही आरोप केला.
यात शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान, करन जोहर व रोहित शेट्टीसारख्या दिग्गजंच्या मीडिया प्रॉडक्शनचाही समावेश आहे. याशिवाय फिल्म असोशियशन, द प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया, द सिने एंड टीव्ही आर्टिस्ट असोशियशन, द फिल्म एंड प्रोड्युसर काऊंसिल आणि स्क्रीन रायटर्स असोशिय़शनचा समावेश आहे.
सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. त्यातील ड्रग्ज व अन्य गोष्टीमुळे सिनेजगत ढवळून निघाले.बॉलीवडूच्या काही दिग्गज निर्मात्यांनी व संघटनांनी चित्रपट उद्योगाशी निगडीत लोकांची गोपनियता भंग केल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे त्यांचे प्रसारण रोखण्यात यावे अशी मागणी केली आहे. यात रिपब्लिकन टीव्हीचे एडिटर अर्नब गोस्वामी, रिपोर्टर प्रदीप भंडारी, टाईमन्स नाऊचे एडिटर इन चीफ राहुल शिवशंकर. ग्रुप एडिटर नविका कुमार व काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध सोशल मीडियासहित विविध प्लॅटफॉर्मवर होत असलेले आरोप व कमेंट्सवर प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे.